शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

"नवं जुनं" सदरासाठी....(कलारंग पान)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:11 IST

- किंवा - भविष्यातील कादंबरीकारांशी मुक्त संवाद सोशल मीडियामुळे आज ''लेखक-कवी'' अशी ओळख झटपट मिळवणं आणि मिरवणं तसं खूप ...

- किंवा -

भविष्यातील कादंबरीकारांशी मुक्त संवाद

सोशल मीडियामुळे आज ''लेखक-कवी'' अशी ओळख झटपट मिळवणं आणि मिरवणं तसं खूप सुलभ झालं आहे. मात्र हेही तितकंच खरं की, या माध्यमांमुळे अनेकांना त्यांचे रसरशीत जीवनानुभव शब्दबद्ध करण्याची संधी मिळाली. गेली दहा-पंधरा वर्षे लेखक, कवी प्रकाशित होण्याचं संख्यात्मक प्रमाण झपाट्यानं वाढलं. यातील बहुसंख्य ''स्वयंप्रकाशित'' झाले असले तरी, अनेक नवी लिहिती नावं पुढे आली. ताज्या दमाच्या, आजचे संदर्भ, प्रश्न, घटना, प्रसंग मांडणाऱ्या रोज नव्या कथा, कविता समोर येऊ लागल्या. माझ्यासारखे नवोदितही स्वतःला आजमावून पाहू लागले. एकापरीनं हा संक्रमणाचा काळ आहे. समाज नेहमीच स्थित्यंतरातून जात असतो. त्याचे पडसाद साहित्यात उमटत असतात हे आपण जाणतोच. अशा टप्प्यावर आपल्या आधी कोणी काय काय उभारून ठेवलं आहे ते जवळून पाहणं, अनुभवणं, जाणणं महत्त्वाचं असतं.

मराठी साहित्यातलं, विशेषतः कादंबरी विश्वातलं श्री. ना. पेंडसे हे नाव त्या अर्थानं फार महत्त्वाचं आहे. एका सामान्य कारकुनाच्या रोजनिशीच्या स्वरूपात लिहिलेली ''लव्हाळी'' आणि त्यात थेट महायुद्धाचे येणारे संदर्भ, त्याचा या सामान्य कारकुनाच्या रोजच्या सामान्य जगण्याशी येणारा संबंध याचं चित्रण वाचताना किंवा ऑक्टोपससारख्या कादंबरीत संवाद आणि पत्रं अशी मांडणी करत केलेला प्रयोग अनुभवताना, गारंबीच्या बापू आणि राधाची गोष्ट वाचताना काय किंवा कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक अशा सर्व धाग्यांची कसबी कारागिरीने गुंफण करून विणलेले ''तुंबाडचे खोत'' हे द्विखंडात्मक महा-शब्दवस्त्रच ज्यात प्रेम, लोभ, राग, माया, स्वार्थ, सूड, लंपटपणा, मुरब्बीपणा, बेरकी वृत्ती, धडाडी, जिद्ध, ऋषीतुल्यता, देशप्रेम, त्याग, बलिदान अशी बहुतेक सर्व मानवी स्वभावविशेष खुबीने ओवली आहेत. हे सगळं वाचताना थरारून जायला होतं. हे असं का होतं? याचा कुतूहल म्हणून शोध घेतल्यावर त्यांच्याच ''रथचक्र'' या कादंबरीच्या प्रस्तावनेतून आणि विशेषतः त्यांच्या ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या विस्तृत आत्मचरित्रातून याचं उत्तर सापडतं.

रथचक्रच्या प्रस्तावनेत ते म्हणतात की,

"समाजाला काही शिकवण्याकरिता, संदेश देण्याकरिता मी लिहीत नसून मला जाणवलेल्या अनुभूतीला आकार देण्याचा मी प्रयत्न करत आहे."

"मला जे जाणवतं ते सर्जनाचा विषय होण्याला पात्र आहे? का? जीवनाचा किती खोलवर मी ठाव घेतो आहे? माझ्या निर्मितीत व्यापक सत्याचा अंश आहे? का? मी माणसं निर्माण करतो की ठोकळे? या निकषांवर माझी कादंबरी लटपटणार असेल, तर प्रादेशिकतेचं पलिस्तर तिचं संरक्षण काय करणार?” ही दोन्ही विधानं या कादंबरीच्या दुसऱ्या आणि चौथ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतील आहेत हे विशेष लक्षात घेण्याजोगं आहे.

पेंडसे यांनी उद्याच्या कादंबरीकारांशी साधलेला एक मुक्त संवाद (मॅजेस्टिक प्रकाशन) मुळातून वाचण्याजोगा आहे. यात लेखक आणि सामान्य माणूस एखाद्या घटनेकडे कसं पाहतो इथपासून ते कादंबरीचं व्याकरण, व्यक्तिरेखेचं मर्मस्थान, निर्लेपदृष्टी, वास्तवाचं भान, साधना, शैली, प्रादेशिकतेचं भान, कारागिरी, लेखकाची वाढ, वाचन, समीक्षा अशा अनेक मुद्द्यांचं विस्तृत विवेचन केलं आहे. हे विवेचन अनुभवसिद्ध आहे.

कथा, कविता, ललितलेखन, प्रासंगिक, वैचारिक अशा सर्व प्रकारच्या लेखनात हे असे नवे वारे वाहत असताना वयानं वृद्ध झालेले किंवा शरीराने कालवश झालेले लेखक, कवी आणि त्यांच्या साहित्यकृतींबद्दल नव्याने चर्चा घडते आहे. अशी घुसळण फार महत्त्वाची असते. कारणपरत्वे अनेकदा ज्या वाटेवरून आपण चाललो आहोत त्यावर पूर्वी उमटलेल्या पाऊलखुणांची आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अशा वेळी अशा चर्चा, उजळणी आवश्यक ठरते.

अक्षय प्रभाकर वाटवे

(लेखक)