शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

"नवं जुनं" सदरासाठी....(कलारंग पान)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:11 IST

- किंवा - भविष्यातील कादंबरीकारांशी मुक्त संवाद सोशल मीडियामुळे आज ''लेखक-कवी'' अशी ओळख झटपट मिळवणं आणि मिरवणं तसं खूप ...

- किंवा -

भविष्यातील कादंबरीकारांशी मुक्त संवाद

सोशल मीडियामुळे आज ''लेखक-कवी'' अशी ओळख झटपट मिळवणं आणि मिरवणं तसं खूप सुलभ झालं आहे. मात्र हेही तितकंच खरं की, या माध्यमांमुळे अनेकांना त्यांचे रसरशीत जीवनानुभव शब्दबद्ध करण्याची संधी मिळाली. गेली दहा-पंधरा वर्षे लेखक, कवी प्रकाशित होण्याचं संख्यात्मक प्रमाण झपाट्यानं वाढलं. यातील बहुसंख्य ''स्वयंप्रकाशित'' झाले असले तरी, अनेक नवी लिहिती नावं पुढे आली. ताज्या दमाच्या, आजचे संदर्भ, प्रश्न, घटना, प्रसंग मांडणाऱ्या रोज नव्या कथा, कविता समोर येऊ लागल्या. माझ्यासारखे नवोदितही स्वतःला आजमावून पाहू लागले. एकापरीनं हा संक्रमणाचा काळ आहे. समाज नेहमीच स्थित्यंतरातून जात असतो. त्याचे पडसाद साहित्यात उमटत असतात हे आपण जाणतोच. अशा टप्प्यावर आपल्या आधी कोणी काय काय उभारून ठेवलं आहे ते जवळून पाहणं, अनुभवणं, जाणणं महत्त्वाचं असतं.

मराठी साहित्यातलं, विशेषतः कादंबरी विश्वातलं श्री. ना. पेंडसे हे नाव त्या अर्थानं फार महत्त्वाचं आहे. एका सामान्य कारकुनाच्या रोजनिशीच्या स्वरूपात लिहिलेली ''लव्हाळी'' आणि त्यात थेट महायुद्धाचे येणारे संदर्भ, त्याचा या सामान्य कारकुनाच्या रोजच्या सामान्य जगण्याशी येणारा संबंध याचं चित्रण वाचताना किंवा ऑक्टोपससारख्या कादंबरीत संवाद आणि पत्रं अशी मांडणी करत केलेला प्रयोग अनुभवताना, गारंबीच्या बापू आणि राधाची गोष्ट वाचताना काय किंवा कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक अशा सर्व धाग्यांची कसबी कारागिरीने गुंफण करून विणलेले ''तुंबाडचे खोत'' हे द्विखंडात्मक महा-शब्दवस्त्रच ज्यात प्रेम, लोभ, राग, माया, स्वार्थ, सूड, लंपटपणा, मुरब्बीपणा, बेरकी वृत्ती, धडाडी, जिद्ध, ऋषीतुल्यता, देशप्रेम, त्याग, बलिदान अशी बहुतेक सर्व मानवी स्वभावविशेष खुबीने ओवली आहेत. हे सगळं वाचताना थरारून जायला होतं. हे असं का होतं? याचा कुतूहल म्हणून शोध घेतल्यावर त्यांच्याच ''रथचक्र'' या कादंबरीच्या प्रस्तावनेतून आणि विशेषतः त्यांच्या ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या विस्तृत आत्मचरित्रातून याचं उत्तर सापडतं.

रथचक्रच्या प्रस्तावनेत ते म्हणतात की,

"समाजाला काही शिकवण्याकरिता, संदेश देण्याकरिता मी लिहीत नसून मला जाणवलेल्या अनुभूतीला आकार देण्याचा मी प्रयत्न करत आहे."

"मला जे जाणवतं ते सर्जनाचा विषय होण्याला पात्र आहे? का? जीवनाचा किती खोलवर मी ठाव घेतो आहे? माझ्या निर्मितीत व्यापक सत्याचा अंश आहे? का? मी माणसं निर्माण करतो की ठोकळे? या निकषांवर माझी कादंबरी लटपटणार असेल, तर प्रादेशिकतेचं पलिस्तर तिचं संरक्षण काय करणार?” ही दोन्ही विधानं या कादंबरीच्या दुसऱ्या आणि चौथ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतील आहेत हे विशेष लक्षात घेण्याजोगं आहे.

पेंडसे यांनी उद्याच्या कादंबरीकारांशी साधलेला एक मुक्त संवाद (मॅजेस्टिक प्रकाशन) मुळातून वाचण्याजोगा आहे. यात लेखक आणि सामान्य माणूस एखाद्या घटनेकडे कसं पाहतो इथपासून ते कादंबरीचं व्याकरण, व्यक्तिरेखेचं मर्मस्थान, निर्लेपदृष्टी, वास्तवाचं भान, साधना, शैली, प्रादेशिकतेचं भान, कारागिरी, लेखकाची वाढ, वाचन, समीक्षा अशा अनेक मुद्द्यांचं विस्तृत विवेचन केलं आहे. हे विवेचन अनुभवसिद्ध आहे.

कथा, कविता, ललितलेखन, प्रासंगिक, वैचारिक अशा सर्व प्रकारच्या लेखनात हे असे नवे वारे वाहत असताना वयानं वृद्ध झालेले किंवा शरीराने कालवश झालेले लेखक, कवी आणि त्यांच्या साहित्यकृतींबद्दल नव्याने चर्चा घडते आहे. अशी घुसळण फार महत्त्वाची असते. कारणपरत्वे अनेकदा ज्या वाटेवरून आपण चाललो आहोत त्यावर पूर्वी उमटलेल्या पाऊलखुणांची आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अशा वेळी अशा चर्चा, उजळणी आवश्यक ठरते.

अक्षय प्रभाकर वाटवे

(लेखक)