शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

नवले पूल बनलाय ‘मौत का कुआँ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 03:09 IST

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष; सिग्नल यंत्रणा नाइलाजास्तव बंद

- कल्याणराव आवताडे नऱ्हे : येथील नवले पुलाखाली असलेल्या सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले, मात्र उद्घाटनानंतर तीन-चार दिवसांतच ही सिग्नल यंत्रणा बंद ठेवावी लागली.नवले पुलाखाली वारंवार वाहतूककोंडी होते तसेच येथे अपघातही बऱ्याच वेळेला घडत असतात आणि ह्यात बºयाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांच्या मागणीवरून अखेर येथे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात महिला व बालकल्याण सभापती राजश्री नवले यांच्या निधीतून सिग्नलही बसविण्यात आले.मात्र सिग्नल बसविल्यानंतर तीन-चार दिवसांतच सिग्नल बसविण्या अगोदरपेक्षाही जास्त वाहतूककोंडी होत असल्याने नाइलाजस्तव वाहतूक पोलिसांनी सिग्नल बंद ठेवून वाहतूक पोलीस स्वत: वाहतूककोंडी टाळण्यासाठी गर्दीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी स्वत: उभे राहून वाहतूक नियोजन करत आहेत. यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपयुक्त तेजस्वी सातपुते यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला उपाययोजना सुचवून त्या पूर्तता करण्याबाबतचे पत्र दिले आहे, यामध्ये नवले पुलाखालून नºहे गावाकडे जाणारा पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता हा सिंगल असून येणारे व जाणारे वाहनासाठी तो रस्ता पुरेसा नाही. नºहे गावातून आलेली वाहने ही पुलाखाली सिग्नलला थांबल्यानंतर वाहनांना रस्ता जाण्यासाठी शिल्लक राहत नाही. तसेच कात्रज बायपासकडून येणाºया वाहनांना नवले पूल गर्दीच्या वेळी अपुरा पडतो.उपाययोजनांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?दोनच दिवसांपूर्वी मुंबईकडून मांढरदेवीकडे निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात याच ठिकाणावर झाला. यात८ भाविक गंभीर जखमी झाले. नवीन कात्रज बोगदा ते वडगाव पुलादरम्यान महामार्गावर तीव्र उतार असून त्यासाठी तिथे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ५० अथवा १०० फुटापर्यंत पांढरे पट्टे करण्याच्या उपाययोजनाही सुचविल्या होत्या, तशा उपाययोजनांचे पत्रही सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिले आहे, मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सुचविलेल्या उपाययोजनांकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.ठळक मुद्देसिग्नल असून अडचण नसून खोळंबाजाणाºया - येणाºया वाहनांसाठी पुरेसा सर्व्हिस रस्ता नसल्याने वाहतूककोंडीसिग्नल चालू ठेवल्यास अधिकच वाहतूककोंडीनाईलाजास्तव वाहतूक पोलिसांनी सिग्नल यंत्रणा बंद ठेवली आहे.वाहतूक पोलीस कर्मचाºयांवर वाहतूक नियमन करण्याचा ताण वाढतो आहे.नवले पुलाखाली ३ वाहतूक पोलीस, १ वॉर्डन आणि१ अधिकारी वाहतूक नियमनासाठी.राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून आम्हाला तशा प्रकारे सूचना मिळाल्या असून येत्या १० दिवसांत नवले पुलाखालील सर्व्हिस रस्त्याच्या साईड पट्ट्या भरून घेतल्या जातील.- बी. के. सिंग,प्रमुख, रिलायन्स इन्फ्राआम्ही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे लेखी मागणी केली असून, त्याचबरोबर प्रत्यक्षातही आम्ही याबाबत पाठपुरावा करत आहोत. मात्र अजून कामास सुरुवात झाली नाही.- राजेंद्र काळेवाहतूक पोलीस निरीक्षकनवले पुलाखाली सर्व्हिस रस्त्याच्या साईडपट्ट्या भरून घेण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारास सूचना दिल्या आहेत. सूचना देऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही.- भीमराव तापकीर, आमदारवाहतूक पोलीस उपायुक्त यांचे पत्र मिळाले असून संबंधित काम हे रिलायन्स इन्फ्राकडे असून त्यांना त्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत.- सोहन निकम, कार्यकारी अभियंताराष्ट्रीय महामार्ग प्रशासननवले पुलाखाली होणारी वाहतूककोंडी आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतूक पोलिसांची होणारी धावपळ पाहता प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.- अतुल हेलोंडे, नागरिक

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा