शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

नैसर्गिक पद्धतीने पोथ्यांचे जतन

By admin | Updated: January 23, 2017 03:05 IST

भारताला साहित्य आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. प्राचीन काळचे ग्रंथ, पोथ्या यांतील ज्ञान नव्या पिढ्यांपर्यंत हस्तांतरित

पुणे : भारताला साहित्य आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. प्राचीन काळचे ग्रंथ, पोथ्या यांतील ज्ञान नव्या पिढ्यांपर्यंत हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने ग्रंथांचे जतन आणि संवर्धन महत्त्वाचे मानले जाते. पुण्यातील वेदभवनामध्ये २००-३०० वर्षांपूर्वीच्या पोथ्यांचे नैसर्गिक पद्धतीने जतन करण्यात आले आहे. सापाची कात वापरून पोथ्यांच्या संरक्षणाची अनोखी पद्धत अवलंबली जात आहे.भारताला प्राचीन काळापासून गुरुकुल परंपरा रूढ आहे. शास्त्रानुसार, पूर्वीच्या काळी गुरुगृही अध्ययन केल्यानंतर आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवावे, असा दंडक होता. त्यानुसार अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे असे. एखाद्याला हे ज्ञान उद्धृत करणे न जमल्यास, लेखनाच्या माध्यमातून आपल्याला अवगत झालेल्या ज्ञानाची पोथी तयार करून ती विद्यार्थ्यांना दान देण्याची पद्धत होती. अशाच शेकडो वर्षांपूर्वीच्या पोथ्या जतन करण्यात आल्याची माहिती मोरेश्वर घैसासगुरुजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.याबाबत घैसासगुरुजी म्हणाले, ‘‘सध्या डिजिटायझेशनची पद्धत रूढ झाली आहे. मात्र, डिजिटायझेशन करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. ही पद्धत अनैसर्गिक असल्याने काही काळाने कागद पिवळा पडण्याची शक्यता असते. याउलट, प्राचीन पोथ्यांमध्ये सापाची कात ठेवल्यास त्या अनेक वर्षे जशाच्या तशा टिकून राहतात. त्याच्या कागदाचा, शाईचा दर्जा यत्किंचितही खालावत नाही. पोथ्यांना कसर लागत नाही.’’वेदभवनामध्ये सापाची कात वापरून सुमारे १०० पोथ्यांचे नैसर्गिक पद्धतीने जतन करण्यात आले आहे. या पोथ्या पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात, असेही ते म्हणाले.