शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

नरसिंहपूर रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:08 IST

नीरा नरसिंहपूर : बावडा-नरसिंहपूर राज्य मार्गावरील जाधवफॉर्म ते नरसिंहपूर रस्त्याचे काम दोन वर्षानंतरही रखडलेले आहे. मातीमिश्रित मुरूमाच्या वापराने रस्त्याचे ...

नीरा नरसिंहपूर : बावडा-नरसिंहपूर राज्य मार्गावरील जाधवफॉर्म ते नरसिंहपूर रस्त्याचे काम दोन वर्षानंतरही रखडलेले आहे. मातीमिश्रित मुरूमाच्या वापराने रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. त्यामुळे रहदारीमुळे तयार झालेल्या धुळीमुळे शेतीपिके नागरिकांचा दम गुदमरू लागला आहे. पिंपरी ते टणू दरम्यान खडीमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून, याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

बावडा-नरसिंहपूर राज्य मार्गाच्या कामाला ५७ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यापैकी शिंदेवस्ती ते पिंपरी बुद्रुक रस्त्याचे २५ कोटींचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले आहे. तर पिंपरी बुद्रक ते जाधव फॉर्म एका बाजूने खडी टाकण्याचे काम चालू होते तेही काम बंद आहे. पण, जाधव फॉर्म ते नरसिंहपूर रस्त्याचे काम दोन वषार्नंतरही ठेकेदाराच्या हेकेखोरपणाने रखडलेलेच आहे. अद्यापही काम संथगतीने पण निकृष्ट दर्जाच्या मुरूमाचा वापर करत संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने धुळीचा ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम चालू करेपर्यंत तरी ठेकेदाराने मुरूम टाकलेल्या ठिकाणी पाणी मारण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी येथील परिसरातील शेतकरी करीत आहेत.

रस्त्यासाठी निकृष्ट दर्जाची माती मुरूमाचा भरावासाठी वापर करण्यात आलेला आहे. त्याची धूळ आजूबाजूला असलेल्या पिकांवर जात असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. तर केलेल्या कामांचा दर्जाही निकृष्ट असून काम बंद पडलेले आहे. अनेक ठिकाणी तर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करत जाण्याची वेळ आली आहे. बांधकाम अधिकारी वैद्य यांना बंद असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात विचारले असता वरूनच सरकार निधीचे पैसे देत नाही म्हणून काम बंद आहे. शासनाचा निधी आल्याशिवाय आम्ही काम कसे चालू करू असा सवाल अधिकारी वर्ग करीत आहे.

नीरा नरसिंहपूर ते पिंपरी बुद्रुक दरम्यान खडीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

०९०१२०२१-बारामती-०१

---------------------