शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नारायणगाव पोलिसांची ८० दुचाकी वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:10 IST

पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नागरिकांना आंतरजिल्हा व इंटरसिटी प्रवास करताना ई-पास ...

पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नागरिकांना आंतरजिल्हा व इंटरसिटी प्रवास करताना ई-पास अत्यावश्यक करण्यात आलेला आहे. तो नसल्याचे आढळून आल्यास त्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला जात आहे तसेच नाकाबंदी व इतर कारवाईच्या वेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर ५०० पर्यंत दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र जिल्हाधिकारी यांना विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा ग्रामीण हद्दीमध्ये कोणीही नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय गाडी घेऊन फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यावर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच तो वापरत असलेले वाहन लॉकडॉऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नारायणगाव पोलीस कार्यक्षेत्रातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय फिरू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ताटे यांनी दिला होता. रविवारी आणि आज दोन दिवस वाहनांची कडक तपासणी करून विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकावर पोलिसांनी कारवाई केली.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांच्यासह सहायक फौजदार शिवाजी केंगले, पोलीस हवालदार काळुराम साबळे, भोगाडे, रमेश काठे, वाहतूक नियंत्रक श्यामसुंदर जायभाये, सुरेश गेंगजे, नवीन अरगडे, होमगार्ड यांच्या मदतीने नारायणगाव पोलिसांनी केली.

दुचाकी घेऊन विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करताना पोलीस अधिकारी पृथ्वीराज साठे व कर्मचारी.