शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

नारायणगाव ग्रामपंचायत अडचणीत

By admin | Updated: November 28, 2015 00:48 IST

नारायणगाव येथील शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेतल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत ही कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही

पुणे : नारायणगाव येथील शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेतल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत ही कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता हे प्रकरण ग्रामपंचायतीच्या चांगलेच अंगलट येणार आहे.नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काही गावगुंडांना हाताशी धरून नारायणगाव-जुन्नर रोडवरील एका गाळ्याचा ताबा मिळविण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईच्याविरोधात गाळेधारकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखल्याने गाळेधारकाचा जीव वाचला.जाधव या गाळेधारकाने दिलेल्या फिर्यादीनुसार भा़ द़ं वि़ कलम ४५२, ४४८, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे ग्रामपंचायत व बाहेरील गुंडांविरुद्घ १८ आरोपींविरुद्घ गुन्हा नोंद केला होता़ पोलिसांनी पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, नारायणगाव ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून ग्रामपंचायतीला अशी कारवाई करण्याचे अधिकार आहेत किंवा नाही, याची लेखी माहिती मागितली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पोलिसांनी दिलेल्या पत्रात सदरची बाब ही सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने गंभीर असून भविष्यात यातून मोठा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे, असे कळविले होते. या पत्राची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईची चौकशी करा व दोन दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश काढले आहेत. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी यशवंत शितोळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी नितीन माने यांनी गुरुवारी ग्रामपंचायतीत जाऊन चौकशी केली. त्यांनी ग्रामपंचायतीची पाहणी व तपासणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या अहवालात ग्रामपंचायतीच्या हद्दीतून राज्यमार्ग १११ चा काही भाग गेलेला आहे. रस्त्याच्या बाजूला ६१ गाळे बांधण्यात आले आहेत. ते १९८९ पासून अस्तित्वात असून सुरुवातीला मोकळ््या जागेत लोक व्यवसाय करीत होते. नंतर शटरचे दरवाजे असलेले पत्र्याचे गाळे लोकांनी बांधले. मुळात हे गाळे बांधलेली जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत. ग्रामपंचायतीने २०११ मध्ये मालकीसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ते ताब्यात नसताना ग्रामपंचायतीला कारवाईचा अधिकार उरत नाही. त्यामुळे त्यांनी केलेली कारवाई बेकायदेशीर ठरू शकते. (वार्ताहर)