शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नानगावचे ‘सहकारी पाणी’ बंद!

By admin | Updated: June 30, 2015 23:15 IST

शेतीसाठी पाण्याचा अतिवापर होत असल्याने शासन ठिबक सिंचनाचा आग्रह धरून पाणीवाटपासाठी सहकारी संस्थांचा आग्रह धरत असतानाच दौंड तालुक्यातील नानगाव

प्रकाश शेलार , केडगावशेतीसाठी पाण्याचा अतिवापर होत असल्याने शासन ठिबक सिंचनाचा आग्रह धरून पाणीवाटपासाठी सहकारी संस्थांचा आग्रह धरत असतानाच दौंड तालुक्यातील नानगाव येथील महाराष्ट्रातील पहिली व सर्वांत मोठी सहकारी पाणीपुरवठा संस्था वीजबिल थकल्याने बंद पडली आहे. नानगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेला ६५ वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. एकूण १२०० एकर जमीन क्षेत्र सिंचनाखाली आणणारी, ४ सर्वाधिक ८०२ सभासदसंख्या असणारी ही सर्वांत मोठी संस्था म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. भीमा नदीवरून प्रत्येकी १०० हॉर्सपॉवर असणारे ३ विद्युतपंप रात्रंदिवस सर्व क्षेत्रासाठी पुरेसे होते. परंतु, या संस्थेचे सुमारे २५ लाख रुपये वीजबिल थकल्याने महावितरणने या संस्थेचा वीजपुरवठा बंद केला आहे. सदरचे वीजबिल गेल्या ५ वर्षांपासून थकले आहे. तीन महिन्यांपूर्वी संस्थेचे वीजजोड कापल्यानंतर सभासद शेतकऱ्यांनी लाईटबिल भरण्यासाठी प्रयत्न न करता खासगी विद्युतपंप उभारून आपापल्या शेतामध्ये पाण्याची कायमची सोय केली. त्यामुळे संस्था अधिकच अडचणीत आली. या संदर्भात संस्थेचे सचिव अशोक रसाळ म्हणाले, की सभासदांकडून थकीत पाणीपट्टी येणे ३५ लाख रुपये आहे. संस्था चालू करण्यासाठी सभासदांची मानसिकता बदलावी तसेच महावितरणने थकीत कर्जामध्ये सूट द्यावी, तरच संस्था चालू होईल. संस्थेचे अध्यक्ष विश्वास भोसले म्हणाले, की आगामी महिन्यात सभासदांची सभा बोलावणार आहे. कार्यक्षेत्रातील काही सभासदांनी वैयक्तिक पाईपलाईन अद्यापही केलेली नाही. त्यांची पिके वाळून चालली आहेत. त्यादृष्टीने ३०० ऐवजी १०० हॉर्सपॉवरच्या विद्युतपंप सुरू करून संस्था नव्याने चालू करणार आहे.१९५0 मध्ये झाली होती स्थापनासंस्थेचे स्वत:चे कार्यालय व विद्युत पंपासाठी सुसज्ज यंत्रणा असणारे शेड आहे. हे शेड भीमा नदीतीरी उभारलेले आहे. विद्युत पंपाद्वारे पाणी खेचून परिसरातील सर्व शेतीला पाईपलाईनने पाणीपुरवठा करून प्रत्येकाच्या शेतामध्ये व्हॉल्व्ह उभारलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात विठ्ठलराव विखे पाटील राहुरी या साखर कारखान्याची स्थापना झाली. याच गोष्टीची प्रेरणा घेऊन ‘विना सहकार नहीं उद्धार’ या तत्त्वावर पुणे लोकल बोर्डाचे अध्यक्ष व नानगावचे शेतकरी सर्जेराव गुंड यांनी या संस्थेची १९५० मध्ये स्थापना केली. या वेळी स्थानिक शेतकरी शेअर गोळा करण्यासाठी दारोदारी फिरले, त्या वेळी काही शेतकऱ्यांनी भांडीकुंडी विकून संस्थेचे शेअर खरेदी केले. शेतकऱ्यांच्या त्यागातून व कष्टातू ही संस्था उभारली. या संस्थेमुळे महाराष्ट्रामध्ये नानगावचे शिवार सर्व प्रथमच सुजलम्-सुफलाम् बनले. याची दखल घेऊन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रत्यक्ष नानगावला येऊन संस्थेचे कौतुक केले. त्यामुळे अल्पावधीत ही संस्था राज्यभर गाजली.