शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

नानगावचे ‘सहकारी पाणी’ बंद!

By admin | Updated: June 30, 2015 23:15 IST

शेतीसाठी पाण्याचा अतिवापर होत असल्याने शासन ठिबक सिंचनाचा आग्रह धरून पाणीवाटपासाठी सहकारी संस्थांचा आग्रह धरत असतानाच दौंड तालुक्यातील नानगाव

प्रकाश शेलार , केडगावशेतीसाठी पाण्याचा अतिवापर होत असल्याने शासन ठिबक सिंचनाचा आग्रह धरून पाणीवाटपासाठी सहकारी संस्थांचा आग्रह धरत असतानाच दौंड तालुक्यातील नानगाव येथील महाराष्ट्रातील पहिली व सर्वांत मोठी सहकारी पाणीपुरवठा संस्था वीजबिल थकल्याने बंद पडली आहे. नानगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेला ६५ वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. एकूण १२०० एकर जमीन क्षेत्र सिंचनाखाली आणणारी, ४ सर्वाधिक ८०२ सभासदसंख्या असणारी ही सर्वांत मोठी संस्था म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. भीमा नदीवरून प्रत्येकी १०० हॉर्सपॉवर असणारे ३ विद्युतपंप रात्रंदिवस सर्व क्षेत्रासाठी पुरेसे होते. परंतु, या संस्थेचे सुमारे २५ लाख रुपये वीजबिल थकल्याने महावितरणने या संस्थेचा वीजपुरवठा बंद केला आहे. सदरचे वीजबिल गेल्या ५ वर्षांपासून थकले आहे. तीन महिन्यांपूर्वी संस्थेचे वीजजोड कापल्यानंतर सभासद शेतकऱ्यांनी लाईटबिल भरण्यासाठी प्रयत्न न करता खासगी विद्युतपंप उभारून आपापल्या शेतामध्ये पाण्याची कायमची सोय केली. त्यामुळे संस्था अधिकच अडचणीत आली. या संदर्भात संस्थेचे सचिव अशोक रसाळ म्हणाले, की सभासदांकडून थकीत पाणीपट्टी येणे ३५ लाख रुपये आहे. संस्था चालू करण्यासाठी सभासदांची मानसिकता बदलावी तसेच महावितरणने थकीत कर्जामध्ये सूट द्यावी, तरच संस्था चालू होईल. संस्थेचे अध्यक्ष विश्वास भोसले म्हणाले, की आगामी महिन्यात सभासदांची सभा बोलावणार आहे. कार्यक्षेत्रातील काही सभासदांनी वैयक्तिक पाईपलाईन अद्यापही केलेली नाही. त्यांची पिके वाळून चालली आहेत. त्यादृष्टीने ३०० ऐवजी १०० हॉर्सपॉवरच्या विद्युतपंप सुरू करून संस्था नव्याने चालू करणार आहे.१९५0 मध्ये झाली होती स्थापनासंस्थेचे स्वत:चे कार्यालय व विद्युत पंपासाठी सुसज्ज यंत्रणा असणारे शेड आहे. हे शेड भीमा नदीतीरी उभारलेले आहे. विद्युत पंपाद्वारे पाणी खेचून परिसरातील सर्व शेतीला पाईपलाईनने पाणीपुरवठा करून प्रत्येकाच्या शेतामध्ये व्हॉल्व्ह उभारलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात विठ्ठलराव विखे पाटील राहुरी या साखर कारखान्याची स्थापना झाली. याच गोष्टीची प्रेरणा घेऊन ‘विना सहकार नहीं उद्धार’ या तत्त्वावर पुणे लोकल बोर्डाचे अध्यक्ष व नानगावचे शेतकरी सर्जेराव गुंड यांनी या संस्थेची १९५० मध्ये स्थापना केली. या वेळी स्थानिक शेतकरी शेअर गोळा करण्यासाठी दारोदारी फिरले, त्या वेळी काही शेतकऱ्यांनी भांडीकुंडी विकून संस्थेचे शेअर खरेदी केले. शेतकऱ्यांच्या त्यागातून व कष्टातू ही संस्था उभारली. या संस्थेमुळे महाराष्ट्रामध्ये नानगावचे शिवार सर्व प्रथमच सुजलम्-सुफलाम् बनले. याची दखल घेऊन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रत्यक्ष नानगावला येऊन संस्थेचे कौतुक केले. त्यामुळे अल्पावधीत ही संस्था राज्यभर गाजली.