शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रातील नंदादीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:12 IST

समाजातील अनाथ, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ११० वर्षांहून अधिक काळ अविरत कार्यरत असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ ...

समाजातील अनाथ, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ११० वर्षांहून अधिक काळ अविरत कार्यरत असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने आजवर हजारो विद्यार्थ्यांना घडवले. याच महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव मंगळवारपासून (दि. १६) सुरु झाला. यानिमित्ताने घेतलेला आढावा...

- डॉ. श्रीपाद पांडुरंग जोशी, पुणे.

१९०९ मध्ये अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना बाळूकाका कानिटकर व सहकाऱ्यांनी केली. कुलगुरू म्हणून दादासाहेब केतकरही दाखल झाले. दानशूरांच्या देणग्या आणि घरोघर माधुकरी मागून भोजन या स्वरुपात दैनंदिन शिक्षण सुरू होते. आश्रमात ग. श्री. खैर व नानासाहेब परुळेकर ही मुलेही शिक्षण घेत होती. खैर आणि परुळेकर या दोघांचे बीए झाल्यावर कुलगुरू दादांनी त्यांना विचारले, तुम्ही पुढे काय करणार? त्यावर त्यांनी आम्ही संस्थेची शाळा सुरू करणार? असून, देणग्या व अल्प वेतनावर काम करणारे सहकारी मिळवू, असे उत्तर दिले.

खैर व परुळेकर यांनी दादासाहेब केतकरांच्या आशीर्वादाने जून १९२१ ला सदाशिव पेठेतील आश्रमाच्या चार खोल्यांत संस्थेची महाराष्ट्र विद्यालय नावाची शाळा सुरू केली. खैर व परुळेकर यांचे समविचारी मित्र विनावेतन काम करण्यास येऊ लागले. देशभक्ती, कर्तव्यदक्षता, शरीरसंवर्धनपूरक व्यायाम, ज्ञानार्जन या सद्गुणांच्या शिक्षणामुळे शाळेची ख्याती वाढू लागली.

उच्च शिक्षणासाठी खैर अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठातून एमए, तर न्यूयॉर्क विद्यापीठातून पीएचडी घेतली. परतल्यावर त्यांनी संस्थेच्या कार्यात वाहून घेतले. हस्तलिखित प्रबंधलेखन, अंकलेखन, वक्तृत्व, वृत्तपत्र बनवणे असे कितीतरी उपक्रम. त्यात यश संपादन करणाऱ्यांना बक्षिसेही दिली जात.

१२ जुलै १९६१ रोजी सकाळी विद्यार्थ्यांना श्रीराम मंदिरापुढे अचानक बोलावण्यात आले. मुलांपुढे पर्यवेक्षक वा. रा. शिदोरे, आश्रम व्यवस्थापक म. बा. नाईक आले. त्यांनी पानशेत धरण पहाटे फुटल्याचे सांगितले. मुळा-मुठा नद्यांना पूर आलेला आहे. तरी गावातील मुलांनी तातडीने घर गाठावे, असे सांगितले. एकच गोंधळ उडाला. माझे शासकीय वसतिगृह स्टेशनकडे होते. आम्ही स्वारगेटमार्गे पळत सुटलो. दुसऱ्या दिवशी पूरग्रस्त लोकांनी आमच्या शाळेत आश्रय घेतला होता. आश्रमातील मुले त्यांना भोजन वाटत होती.

१९२१ ते १९६४ इतका प्रदीर्घ काळ खैर शाळेचे, संस्थेचे नेतृत्व करीत होते. १९३५ साली मुंबईचे शिक्षणमंत्री रँ. र. पु. परांजपे यांनी शाळेला भेट दिली. शालेय उपक्रम समजून घेतले. त्यांनी पुढील अभिप्राय लिहिला. तो असा होता, मला विश्वास आहे की, शिक्षण खाते या संस्थेचे काळजीपूर्वक निरीक्षण करुन तेथील काही उपक्रम शिक्षणपद्धतीत राबवेल.

खैर यांनी संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली. या संघटनेला ५५ वर्षे झाली आहेत. १२ मे रोजी जास्तीत जास्त माजी विद्यार्थी वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्र जमतो. आमची संस्था, शाळा दरसाल एका आदर्श माजी विद्यार्थ्याचा गौरव करते. ‘मासिक समाचार’ हे संस्थेचे मुखपत्र दरमहा विद्यार्थ्यांना पाठविले जाते. माजी विद्यार्थ्यांशी स्नेहाचे नाते जपणाऱ्या शाळेचा आणि संस्थेचा आम्हाला नित्य अभिमान वाटतो. महाराष्ट्र विद्यालय ही शाळा शिक्षण क्षेत्रातील नंदादीप आहे. अशा या माझ्या शाळामातेला मी विनम्र अभिवादन करतो.

(लेखक शाळेचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ साहित्यिक आहेत)