शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जिल्हा परिषदेतील टंचाई कक्ष नावापुरता

By admin | Updated: March 17, 2016 03:02 IST

जिल्ह्यात ६४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १४४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला याचे

- बापू बैलकर,  पुणेजिल्ह्यात ६४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १४४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. येथे स्थापन करण्यात आलेला टंचाई कक्ष हा नावापुरताच आहे. फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात टंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेने तातडीची बैठक घेऊन अध्यक्ष प्रदीप कंद यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. यात जिल्हा परिषदेत स्वतंत्र टंचाई कक्ष तत्काळ स्थापन करण्यात यावा व दररोजचा अहवाल सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार १६ फेबु्रवारी रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आदेश काढून १४ जणाच्या टीमवर जबाबदरी निश्चित करून दिली.या टीमचे प्रमुख म्हणून उपकार्यकारी अभियंता चाटे यांच्यावर जबाबदारी दिली. त्यांनी आदेशात नमूद करून दिलेल्या सर्व कामकाजावर समन्वय ठेवायचा आहे. तसेच नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्याशी संबंधित माहिती सायंकाळी ४ वाजेपर्यंत सादर करावी. ही संकलित माहिती प्रमुखाने जिल्हाधिकारीस्तरावर सादर करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या टंचाई कक्षाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना टंचाई कक्ष शोधूनही सापडत नव्हता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या दालनात माहिती घेतली असता, टंचाई कक्ष आहे का नाही, हे तेथील कर्मचाऱ्यांनही माहीत नव्हते. टंचाईकाळात पाणीपुरवठा विभाग काम पाहतो म्हणून पाणीपुरवठा विभागात माहिती घेतली असता, तेथे टंचाई कक्षाचा कुठलाही फलक लावलेला दिसला नाही. कार्यकारी अभियंते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. मग उपकार्यकारी अभियंता चाटे यांच्याकडे टंचाई कक्षाची माहिती विचारली असता त्यांनी होय टंचाई कक्ष स्थापन केला असून, मीच त्याचा प्रमुख आहे, असे सांगितले. त्यांना टंचाईची माहिती विचारली असता बैैठकीला जायाचेय, भाऊसाहेबांकडून माहिती घ्या, असे सांगितले. संबंधित भाऊसाहेबांकडे गेलो असता, मी अध्यक्ष साहेब किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले. मात्र, त्याच दरम्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईसंदर्भातच बोलत होते. त्यांचे बोलणे झाल्यानंतर त्यांनी टंचाई आराखड्याच्या अंमलबजावणीची माहिती त्यांना हवी होती ती देत होतो, असे सांगितले. त्यांना ही माहिती दररोज एकत्र संकलित केली जात नाही का? असे विचारले असता, मी आताच संबंधितांना फोन करून कशीबशी ही माहिती घेतल्याचे सांगितले. बुधवारी पुन्हा चाटे यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, विंधन विहिरी भुसे यांच्याकडे मिळेल, प्रादेशिक पाणीपुरवठा बुरसे यांच्याकडे मिळेल, टँकरची माहिती त्यांच्याकडे मिळेल...असे सांगितले. संकलित माहिती मिळालीच नाही. मुळात टंचाई कक्ष स्थापन करून प्रमुखाने दररोज दिलेल्या कामांची माहिती संकलित करून ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणे अपेक्षित आहे किंवा आदेशात तसे नमूद केले आहे, मात्र याचे गांभीर्य तेथे दिसले नाही. टंचाईबाबत तक्रार कुठे करायची? जिल्हा परिषदेत १३ तालुक्यांतून दररोज कामासाठी ग्रामस्थ येत असतात. त्यांना त्यांच्या गावातील टंचाईबाबत काही तक्रार करायची असेल किंवा माहिती द्यायची असेल, तर त्यांनी कुठे द्यायची? कारण प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर कुठेही टंचाई कक्ष या मजल्यावर आहे, यांच्याशी संपर्क साधा, असा फलक नाही. तसेच, पाणीपुरवठा विभागातही असा फलक लावलेला नाही.