शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील टंचाई कक्ष नावापुरता

By admin | Updated: March 17, 2016 03:02 IST

जिल्ह्यात ६४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १४४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला याचे

- बापू बैलकर,  पुणेजिल्ह्यात ६४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १४४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. येथे स्थापन करण्यात आलेला टंचाई कक्ष हा नावापुरताच आहे. फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात टंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेने तातडीची बैठक घेऊन अध्यक्ष प्रदीप कंद यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. यात जिल्हा परिषदेत स्वतंत्र टंचाई कक्ष तत्काळ स्थापन करण्यात यावा व दररोजचा अहवाल सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार १६ फेबु्रवारी रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आदेश काढून १४ जणाच्या टीमवर जबाबदरी निश्चित करून दिली.या टीमचे प्रमुख म्हणून उपकार्यकारी अभियंता चाटे यांच्यावर जबाबदारी दिली. त्यांनी आदेशात नमूद करून दिलेल्या सर्व कामकाजावर समन्वय ठेवायचा आहे. तसेच नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्याशी संबंधित माहिती सायंकाळी ४ वाजेपर्यंत सादर करावी. ही संकलित माहिती प्रमुखाने जिल्हाधिकारीस्तरावर सादर करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या टंचाई कक्षाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना टंचाई कक्ष शोधूनही सापडत नव्हता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या दालनात माहिती घेतली असता, टंचाई कक्ष आहे का नाही, हे तेथील कर्मचाऱ्यांनही माहीत नव्हते. टंचाईकाळात पाणीपुरवठा विभाग काम पाहतो म्हणून पाणीपुरवठा विभागात माहिती घेतली असता, तेथे टंचाई कक्षाचा कुठलाही फलक लावलेला दिसला नाही. कार्यकारी अभियंते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. मग उपकार्यकारी अभियंता चाटे यांच्याकडे टंचाई कक्षाची माहिती विचारली असता त्यांनी होय टंचाई कक्ष स्थापन केला असून, मीच त्याचा प्रमुख आहे, असे सांगितले. त्यांना टंचाईची माहिती विचारली असता बैैठकीला जायाचेय, भाऊसाहेबांकडून माहिती घ्या, असे सांगितले. संबंधित भाऊसाहेबांकडे गेलो असता, मी अध्यक्ष साहेब किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले. मात्र, त्याच दरम्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईसंदर्भातच बोलत होते. त्यांचे बोलणे झाल्यानंतर त्यांनी टंचाई आराखड्याच्या अंमलबजावणीची माहिती त्यांना हवी होती ती देत होतो, असे सांगितले. त्यांना ही माहिती दररोज एकत्र संकलित केली जात नाही का? असे विचारले असता, मी आताच संबंधितांना फोन करून कशीबशी ही माहिती घेतल्याचे सांगितले. बुधवारी पुन्हा चाटे यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, विंधन विहिरी भुसे यांच्याकडे मिळेल, प्रादेशिक पाणीपुरवठा बुरसे यांच्याकडे मिळेल, टँकरची माहिती त्यांच्याकडे मिळेल...असे सांगितले. संकलित माहिती मिळालीच नाही. मुळात टंचाई कक्ष स्थापन करून प्रमुखाने दररोज दिलेल्या कामांची माहिती संकलित करून ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणे अपेक्षित आहे किंवा आदेशात तसे नमूद केले आहे, मात्र याचे गांभीर्य तेथे दिसले नाही. टंचाईबाबत तक्रार कुठे करायची? जिल्हा परिषदेत १३ तालुक्यांतून दररोज कामासाठी ग्रामस्थ येत असतात. त्यांना त्यांच्या गावातील टंचाईबाबत काही तक्रार करायची असेल किंवा माहिती द्यायची असेल, तर त्यांनी कुठे द्यायची? कारण प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर कुठेही टंचाई कक्ष या मजल्यावर आहे, यांच्याशी संपर्क साधा, असा फलक नाही. तसेच, पाणीपुरवठा विभागातही असा फलक लावलेला नाही.