शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

नाझरे मात्र अद्याप निम्मेच...

By admin | Updated: October 5, 2016 01:44 IST

पुणे जिल्ह्यातील धरणे आता ओव्हरफ्लो होऊन वाहात असताना पुरंदर तालुक्यातील एकमेव मोठे धरण असणारे नाझरे जलाशय आजही निम्मेही भरले नसल्याने तालुक्यात मोठी चर्चा आहे.

जेजुरी : पुणे जिल्ह्यातील धरणे आता ओव्हरफ्लो होऊन वाहात असताना पुरंदर तालुक्यातील एकमेव मोठे धरण असणारे नाझरे जलाशय आजही निम्मेही भरले नसल्याने तालुक्यात मोठी चर्चा आहे. नाझरे जलाशयात आजअखेर केवळ ४१ टक्केच पाणीसाठा झालेला आहे. राज्यासह पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने सर्व जलाशये, धरणे भरून वाहू लागली आहेत. नद्यांनीही उग्र रूप धारण करून वाहण्यास सुरुवात केली आहे. मात्र समुद्रसपाटीपासून सर्वांत उंच असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीला मात्र अजूनही मोठा पूर आलेला नाही. यामुळे जलाशयात पाणीसाठाही झालेला नाही. पुरंदर तालुक्याची पावसाची सरासरी ४७५ मिमी आहे, आजअखेर सरासरी केवळ २७६ मिमी एवढाच पाऊस पडलेला आहे.नदीवरील तालुक्यातील सर्वांत मोठे धरण नाझरे धरण आहे. जिल्हाभरातील धरणांप्रमाणे हे ही धरण पूर्ण क्षमतेने भरेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अजूनही पूर्ण होऊ शकलेली आहे. यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रात आजही चिंतेचे वातावरण आहे. सुमारे ७८८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या नाझरे जलाशयावरून निम्मा पूर्व पुरंदर आणि बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील १६ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर पुरंदर आणि बारामती तालुक्यातील सुमारे १३०० हेक्टर लाभक्षेत्राला शेतीसाठी पाणी दिले जाते. वर्षाला रब्बी व खरीप आवर्तने दिली तर साधारणपणे २०० ते २५० दशलक्ष घनफूट एवढे पाणी शेतीला द्यावे लागते. शिवाय पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना आहेतच. आज जलाशयात केवळ ३२५ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा होऊ शकलेला आहे. (वार्ताहर)