शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नामाचिये बळे, पार केला दिवेघाट

By admin | Updated: July 2, 2016 12:41 IST

अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी नागमोडी वळणाचा ४ किलोमीटरचा दिवे घाटाचा अवघड टप्पा लीलया पार केला.

सासवड : ज्ञानोबा-माऊलीच्या अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी नागमोडी वळणाचा ४ किलोमीटरचा दिवे घाटाचा अवघड टप्पा लीलया पार केला. ऊन-पावसाच्या खेळात ‘नामाचिये बळे, पार केला दिवे घाट’ म्हणत सोहळा सासवडनगरीत विसावला. आळंदीहून निघालेल्या पालखीचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता. पुणेकरांचा पाहुणचार आणि दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने झालेले वारकरी सकाळी सहा वाजताच पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. हडपसर गाडीतळावर सकाळी नऊ वाजता माऊलींची पालखी पोहोचली. सकाळी अकरा वाजता तुकाराममहाराजांची पालखी पोहोचली. येथंपर्यंत एकाच मार्गावरून प्रवास करीत पंढरीचा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवत दोन्हीही पालख्या वेगवेगळ्या दिशांनी निघाल्या. हडपसरहून दिवेघाटात पालखी एक वाजण्याच्या सुमारास पोहोचली. हजारो भक्तांनी नयनरम्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुषवृष्टी करून माऊलींचे स्वागत करण्यात आले. माऊलींच्या रथाला मानाच्या बैलजोडीबरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांनीही रथ ओढला. दुपारी पाच वाजता दिवे घाट चढून आल्यावर झेंडेवाडीतील विसाव्याच्या ठिकाणी मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. झेंडेवाडीनंतर काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे, पवारवाडी येथे स्वागत झाले. सासवडच्या तळावर सायंकाळी सात वाजता सोहळा पोहोचला. शुक्रवार आणि शनिवारी सासवडनगरीत मुक्कामानंतर रविवारी सकाळी पालखी सोहळ्याचे जेजुरीला प्रस्थान होणार आहे. >लोणी काळभोर : माऊली माऊलीचा जयघोष, आसमंतांत घुमणारा टाळ-मृदंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठलनामांत दंग झालेली व भगवी पताका खांद्यावर घेऊन भक्तिभावाने ओथंबलेल्या अभंगाच्या ओळी गात सावळ्या विठुरायाच्या भेटीस आतुरलेली लाखो वैष्णवांची मांदियाळी पुण्यातील नागरिकांचा दोन दिवसांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन जगद्गुरू संतशिरोमणी श्री तुकाराममहाराज पालखी सोहळा जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोरमध्ये पोहोचला.