शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

आचारसंहिता संपताच मंचर होणार नगरपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST

मंचर : आचारसंहिता संपताच मंचर नगरपंचायतीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. मंचर नगरपंचायत ...

मंचर : आचारसंहिता संपताच मंचर नगरपंचायतीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

मंचर नगरपंचायत होणेबाबत शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले. तसेच या बाबत सविस्तर चर्चा केली.

आंबेगाव तालुक्यातील मंचर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी कांदा, भाजीपाला, कापड तसेच सोन्याचांदीची मोठी बाजारपेठ आहे. मंचर शहर व परिसरात अनेक दूध प्रकल्प, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय आहेत. यामुळे तालुक्यातून तसेच जुन्नर, खेड, शिरूर व इतर भागातूनही या ठिकाणी नागरिकांची सतत वर्दळ असते. येथे बटाटा बियाणाची प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने खरेदीसाठी शेतकरी मंचर या ठिकाणी सतत येत असतात. मंचर शहराने नुकताच ९० हजार लोकसंख्येचा टप्पा ओलांडला आहे.

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच इमारत बांधकामामध्ये सुसूत्रता, प्रशस्त रस्ते, वाहनतळ व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृह, अग्निशमन बंब आदी प्रकल्प राबविणे ग्रामपंचायतीला अडचणीचे होत आहे. यामुळे येथे नगरपंचायत होणे अत्यावश्यक आहे. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची वेगळ्या विषयावर गुरुवारी मंत्रालयात बैठक होती. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मंचर नगरपंचायतीबाबत त्यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचेबरोबर मंचर नगरपंचायतीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. आचारसंहिता संपताच मंचर नगरपंचायतीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा केली. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, राजाबाबू थोरात, जे. के. थोरात, सुहास बाणखेले, लक्ष्मण थोरात, अल्लू इनामदार आदी उपस्थित होते.

फोटोखाली: मंचर येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले.