शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

मायबाप सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST

दंडाच्या रकमेतून कोरोना चाचण्या सुरू करा: भाजप पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे बारामती: सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे आज माणूस अन्नाला ...

दंडाच्या रकमेतून कोरोना चाचण्या सुरू करा: भाजप पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

बारामती: सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे आज माणूस अन्नाला देखील महाग झाला आहे. तो दंड कूठून भरणार ? मायबाप सरकार इथे प्रत्येक माणूस भीतीच्या वातावरणात आहे. कोणीच विनाकारण घराबाहेर पडत नाही किंबहुना प्रत्येकाला आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाची चिंता आहे. तरी दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी. दोन वर्षांत दंडाच्या पावत्या मधून जमा केलेल्या रकमेमधून ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी सुरू करावी ,अशा शब्दांत भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस गजानन वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

याबाबत वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. कोरोना तपासणी व दंडात्मक कारवाई बद्दल राज्यात सुरू असलेला कोरोना महामारीचा संसर्ग यामुळे सामान्य जनता घाबरली आहे. व्यापारी, तथा लघू उद्योजक, तसेच घरातील रूग्णांनमुळे बाहेर पडणारा सामान्य नागरिक हा गेले वर्षभर कमी जास्त प्रमाणात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पूर्णपणे आर्थिक अडचणीत आलेला आहे.

आता संसर्ग वाढत असून रुग्णसंख्या वाढली आहे.या काळात व्यापारी, शेतमाल विक्रेते यांची कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.निर्णय चांगला आहे परंतु लाखो लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एक तपासणी केंद्र आहे .त्यामुळे तेथे तपासणी करता लोक जमल्यास गर्दी होत असून तपासणीसाठी आलेल्या बऱ्याच लोकांना वारंवार तपासणी न करता परत जावे लागत आहे. यामुळे लोक तपासणी ला टाळाटाळ करत आहेत. अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक, तसेच महत्वाच्या कामासाठी इच्छा नसतानाही घराबाहेर पडलेलले लोक हे बॅंकेचे हप्ते,जागाभाडे, लाईट बिल, दवाखान्याचा खर्च या मुळे मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे त्याची आवक बंद झाली आहे .तरी देखील आपल्या आदेशाने यांच्या वर सर्रास दंडात्मक कारवाई केली जात आहे.

आरोग्य केंद्र नसेल त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. काही कारणास्तव विना मास्क बाहेर पडणाºयांना रस्त्यावर मोफत मास्क देण्याची सोय करावी.या पत्राद्वारे आम्ही आपणास महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सध्याच्या परिस्थितीत निर्माण होत असल्याने अडचणींनवर तातडीने मार्ग काढण्यासाठी विनंती करीत आहे. दम्याचा त्रास असणारा मास्क मध्ये गुदमरतोय.तरी तो घरा बाहेर का पडतोय ? हे सगळं आपुलकीने जाणून घेण्याची गरज आहे .त्याची कारणे नक्कीच डोळे पाणावणारी आहे. मुख्यमंत्रीसाहेब या पत्राचा राजकारण म्हणून विचार न होता सहानुभूतीने विचार करावा,अशी मागणी वाकसे यांनी केली आहे.