शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

भारतातील मुस्लिम सुरक्षित

By admin | Updated: May 4, 2017 03:00 IST

देशात मुस्लिमांसंबंधी काही अनुचित प्रकार घडत आहेत. पण इतर देशापेक्षा भारतातील मुस्लिम समाज सुरक्षित असून

पुणे : देशात मुस्लिमांसंबंधी काही अनुचित प्रकार घडत आहेत. पण इतर देशापेक्षा भारतातील मुस्लिम समाज सुरक्षित असून स्वातंत्र्यदेखील आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान यांनी व्यक्त केले.हमीद दलवाई स्मृती पुरस्कार इब्राहिम खान यांना माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी खान बोलत होते. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च अ‍ॅन्ड इन्स्टिट्यूट आणि साधना साप्ताहिकाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पाकिस्तानातील संपादक अजमल कमाल, इन्स्टिट्यूटच्या मेहरुन्निसा दलवाई, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बहाळकर उपस्थित होते. इतर देशामधील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असुरक्षित आणि दहशतीखाली जीवन जगत आहे. त्या तुलनेत भारतातील मुस्लिम समाज हा सुरक्षित आहे, पण याची भारतातील मुस्लिम समाजाला जाणीव आहे का ? असा सवाल इब्राहिम खान यांनी उपस्थित केला. हमीद दलवाई हे मुस्लिम धर्माच्या पुढचा विचार करत होते. त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. पण त्यांचे विचार समजून घेण्याची मुस्लिमांची तयारी नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)पुरस्काराबद्दल कौतुकहमीद दलवाई जे काम करत होते, त्यामुळे ते समाजापासून दूर गेले. समाजही आपल्याला दूर लोटेल या भीतीमुळे दलवाई यांच्या नावाने पुरस्कार घेण्यास अनेक जण नकार देतात. पण खान यांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे भाई वैद्य यांनी कौतुक केले. सर्वच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. धर्मचिकित्सा आणि चुकीच्या गोष्टींसंबंधी प्रगतिशील भूमिका घेण्याची गरज आहे.- हेमंत गोखले