शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आत्ममग्नतेची संगीत मैफल ही आनंदयात्राच!

By admin | Updated: June 29, 2017 03:26 IST

व्हायोलिनवादनामध्ये आत्ममग्नतेचा आनंद, रसिकांचा आनंद आणि दिग्गज कलाकारांना ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद

व्हायोलिनवादनामध्ये आत्ममग्नतेचा आनंद, रसिकांचा आनंद आणि दिग्गज कलाकारांना ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद ही अनोखी आनंदयात्राच असते. शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकार आपल्यात नसले तरी त्यांनी आपल्या नाममुद्रेसह स्वरमंदिरे उभी केली आहेत. प्रत्येक मैफल हा नवीन जन्म, नवी साधना आणि नवा विचार असतो. मैफलींमध्ये रंगून जाताना आयुष्य त्रोटक आहे, असे वाटू लागते. नव्या पिढीने ही संगीतसाधना आत्मसात करून परिपूर्णतेच्या दिशेने प्रवास करावा, असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त व्यक्त केले.व्हायोलिनवादनाची प्रत्येक मैफल हा नवीन जन्म, नवी साधना आणि नवा विचार असतो. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये रंगून जाताना आयुष्य त्रोटक आहे, असे वाटू लागते. प्रत्येक मैफलीतून एकमेवाद्वितीय आनंद मिळत असतो. त्यामुळे त्यामध्ये डावे-उजवे असे ठरवता येत नाही. मैफलीचा आनंद हे कलावंत आणि रसिकांमधील अदृश्य तरीही मनस्वी आनंद देणारा झरा असतो. गाण्याचा आनंद घेणारा, जाणकार बुद्धिजीवी रसिकवर्ग समोर असेल, तर वादन अधिकच खुलते. मी देशाप्रमाणे परदेशातही व्हायोलिनवादनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. पुण्यामध्ये अनेक संगीत मैफली होतात; मात्र परदेशातील रसिकांना अशा मैफलींचा आनंद अभावानेच घेता येतो. त्यामुळे तेथील मैफली कायमच रंगतात.व्हायोलिनवादनाचे बाळकडू मला घरातूनच मिळाले. माझे वडील गुरुवर्य बाळकृष्ण उपाध्ये यांच्याकडून मी व्हायोलिनचे धडे गिरवले. वडिलांनी १९५१ साली व्हायोलिन अ‍ॅकेडमीची सुरुवात केली. मी गेल्या ४५ वर्षांपासून वादन करत आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली संधी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ, बासरीवादक पं. रोणू मुजूमदार, दया शंकर, उस्ताद दिलशाद खाँ या कलावंतांसमवेत रंगलेली जुगलबंदी कायम लक्षात राहणारी आहे. शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकार आपल्यात नसले तरी त्यांनी आपल्या नाममुद्रेसह स्वरमंदिरे उभी केली आहेत.शहरी भागात शास्त्रीय संगीताच्या मैफली सातत्याने होत असल्याने कानसेन तयार होतात. ग्रामीण भागातही संगीताचे जाणकार असतात. केवळ संगीत त्यांच्यापर्यंत पोचण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच मी अनेक गायकांसह सोलापूर, कोल्हापूर, अमरावती अशा ठिकाणी जाऊन मैफली आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतो. व्हायोलिनवादनामध्ये आत्ममग्नतेचा आनंद, रसिकांचा आनंद आणि दिग्गज कलाकारांना ‘याचि देहि, याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद ही अनोखी आनंदयात्राच असते. शास्त्रीय संगीताने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. परदेशामध्ये संगीत हा विषय शिक्षणात अंतर्भूत करण्यात आला आहे. आपल्याकडे अद्याप ती यंत्रणा विकसित झालेली नाही. मुलांमध्ये उपजतच संगीताची आवड असते. ही अभिरुची वृद्धिंगत करायची असेल तर मुलांवर लहानपणापासून संगीताचे संस्कार करायला हवेत. त्यासाठी शाळा-शाळांमध्ये जाऊन ‘म्युझिक अ‍ॅप्रिसिएशन कोर्स’च्या माध्यमातून संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.संगीत हे मन:शांतीसाठी प्रभावी माध्यम आहे. संगीतामुळे मनावरील ताण नाहीसा होतो आणि प्रसन्नता लाभते. शास्त्रीय संगीतामध्ये रियाझाला अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र, किती तास रियाझ केला जातो, यापेक्षा किती डोळसपणे आणि योग्य दिशेने रियाझ सुरू आहे का, याला महत्त्व असते. चुकीच्या दिशेने होणारा रियाझ निरुपयोगी ठरतो. गायन आणि वादनाच्या रियाझासाठी गुरूला योग्य विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला योग्य गुरू मिळाल्यास जडणघडणीचा प्रवास आनंददायी असतो. आजकाल तरुण मोठ्या संख्येने व्हायोलिनवादनाकडे वळू लागले आहेत, हे आशादायी चित्र आहे. व्हायोलिन हे मानवी स्वराच्या जवळ जाणारे वाद्य आहे. त्यामुळे व्हायोलिनवर ठुमरी, तराणा, जोडझाला, धून असे वैविध्यपूर्ण वादन करता येते.१०० व्हायोलिन एकत्र वाजवले तरी गोंगाट न होता सुरेल वातावरण निर्माण होते. व्हायोलिनच्या पूर्णत्वाकडे जायला पुढील ५० वर्षे लागतील, असेही ते म्हणाले.