शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महापालिकेच्या शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा

By admin | Updated: March 21, 2015 00:14 IST

महापालिकेकडून दहावी, बारावीमधील गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा सुरू असल्याची बाब शुक्रवारी पुन्हा मुख्य सभेत समोर आली.

पुणे : महापालिकेकडून दहावी, बारावीमधील गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा सुरू असल्याची बाब शुक्रवारी पुन्हा मुख्य सभेत समोर आली. या शिष्यवृत्तीसाठी एक लाखाच्या उत्पन्नाची अट लावण्यास तसेच ती थेट बँकेत जमा करण्यास मागील महिन्यात मुख्य सभेत सर्वपक्षीय विरोध झाला होता. त्यामुळे जवळपास १ हजाराहून अधिक मुलांची शिष्यवृत्ती बँकेत जमा न करता त्यांचे धनादेश काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असतानाच आता पुन्हा ही शिष्यवृत्ती खात्यात जमा करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय मुख्य सभेत घेण्यात आला आहे.त्यामुळे नगरसेवकांना नेमकी काय भूमिका घ्यायची याबबतचा संभ्रम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.या वेळी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी या मुलांची शिष्यवृत्ती थेट खात्यात जमा करण्यात येणार होती. मात्र, मुख्य सभने धनादेश काढण्याचे आदेश दिल्याने ती ३१ मार्चपर्यंत देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याने जगताप यांनी सांगितले.त्यानंतर या शिष्यवृत्तीचे श्रेय घेण्यासाठी नगरसेवकांकडून आटापीटा केला जात असताना विद्यार्थ्याला प्रतिचेक ४८ रुपये खर्च करावा लागत असल्याचे सांगत काँग्रेसच्या नगरसेविका कमल व्यवहारे यांनी आॅनलाइन पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करावे, अशी भूमिका मांडली. त्याला पाठिंबा देत डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ही भूमिका उचलून धरली; मात्र भाजपा आणि मनसेच्या नगरसेवकांनी याला आक्षेप घेत चेकद्वारेच पैसे द्या, अशी आग्रही मागणी करत याला विरोध केला.मात्र, अनेक नगरसेवकांनी त्यास विरोध केला. त्या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा करावी व ही शिष्यवृत्ती थेट बँकेत जमा करण्याचा तसेच त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च येत असल्याने त्यास अट घालण्याची मागणी मनसेचे गटनेते बाबू वागकर यांनी केली. त्यानुसार, याबाबत पक्षनेत्यांनी निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)प्रशासनावरच टीका४महापालिकेच्या शाळांमधून दहावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या ७१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत चर्चेसाठी आला होता. या वेळी भाजपाच्या नगरसेवकांनी आधीची शिष्यवृत्ती अद्याप पालिकेस मिळाली नसल्याचे सांगत प्रशासनावर टीका करण्यास सुरुवात केली.