शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका गटनेत्यांचा दावा विजयाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:11 IST

एक किंवा दोनचा प्रभाग झाला तर आता आपले काय होणार? या धास्तीत असलेल्या अनेक इच्छुकांच्या आशा आता पल्लवित झाल्या ...

एक किंवा दोनचा प्रभाग झाला तर आता आपले काय होणार? या धास्तीत असलेल्या अनेक इच्छुकांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरी गेली तरी आपल्याला संधी निश्चित मिळेल या आशेने अनेकांनी मोर्चेबांधणी चालू केली आहे.

चौकट

सध्याची पालिकेतील स्थिती (नगरसचिव कार्यालयातील नोंद)

भाजप : ९७

राष्ट्रवादी काँग्रेस : ४२

काँग्रेस : १०

शिवसेना : १०

मनसे : २

एआयएमआयएम : १

( दोन जागा रिक्त (दिवंगत सदस्य))

चौकट

१६६ ते १६८ नगरसेवक

“नवीन तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे शहरात साधारणतः ५५ ते ५६ प्रभाग होणार असून नगरसेवकांची संख्या १६६ ते १६८ होणार आहे. एका प्रभागात सुमारे ५४ ते ६३ हजार मतदार राहणार असून, प्रत्येकाला तीन उमेदवारांना मतदान करायचे आहे.

चौकट

महापालिका गटनेत्यांचा दावा विजयाचा

“राज्य सरकारने तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्याने अत्यंत अनुकूल स्थिती भारतीय जनता पक्षासाठी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन सदस्यांचा प्रभाग व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. २०२२ च्या निवडणुकीत 'अब की बार सौ पार ' असेच चित्र निश्चित पाहायला मिळेल.”

-गणेश बिडकर, भाजपा

-----

“तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी भाजपचा पराभव होऊन, येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल व महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल.”

-दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी

------

“सन २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना असताना काँग्रेस महापालिकेत सत्तेवर आली होती. यावेळीही तीनचा प्रभाग रचना झाल्याने आमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून महापालिकेत पुन्हा काँग्रेसचा महापौर होईल असा विश्वास आहे.”

-आबा बागूल, कॉंग्रेस

------

“२००२ च्या निवडणुकीत तीनचा प्रभाग असताना शिवसेनेला २१ जागा मिळाल्या होत्या. आता पुन्हा तीनचा प्रभाग झाल्याने शिवसेनेला शहरात चांगले यश मिळेल असा विश्वास आहे. महाविकास आघाडीने तीनचा प्रभाग केल्याचे आम्ही स्वागत करतो.”

-पृथ्वीराज सुतार, शिवसेना

------

“दोन सदस्यीय प्रभाग असताना मनसेचे २८ नगरसेवक महापालिकेत होते. तीन सदस्यीय प्रभाग रचनेचे आम्ही स्वागत करतो, ही रचना नक्कीच मनसेची संख्या शहरात वाढवेल व पुण्याचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच ठरवेल.”

-साईनाथ बाबर, मनसे

--------