इंदापूर : सांडपाणी व्यवस्थापन व पथदिव्यांच्या कामाचे साहित्य येऊन पडलेले आहे. मात्र काम सुरू करण्याकरिता नगरपरिषदेला मुहूर्त मिळेनासा झाला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या गणेशनगर, साईनगर येथील रहिवाशांनी स्व:खर्चाने भाडोत्री वाहन करून ते सर्व साहित्य नगरपरिषदेकडे परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर बारीक खडी अंथरण्यात आली. मात्र बहुतेक भाग दुर्लक्षित राहिला आहे. गेल्या दीड दोन महिन्यांपासून राजेंद्र हजारे व त्यांचे सहकारी पाठपुरावा करत आहेत. साहित्य येऊन पडले आहे. काम सुरू होत नाही. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर केवळ आश्वासने मिळत आहेत. इजगुडे, मुख्याधिकारी कामठे तातडीने काम सुरु करतो असे सांगतात. पण कामच सुरु होत नाही. नगरपरिषदेने एक निश्चित पाऊल उचलावे. आश्वासनावर झुलवत ठेवू नये, या लोकांच्या रास्त अपेक्षा काम सुरु होत नसल्याने फोल ठरल्या आहेत. त्यातूनच हे साहित्य साभार परत करण्याच्या निर्णयापर्यंत नागरिक आल्याचे चित्र आहे.
नगरपरिषदेला मिळेना मुहूर्त
By admin | Updated: February 2, 2016 01:10 IST