शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पूररेषेतील सोसायट्यांना महापालिकेची नोटीस

By admin | Updated: January 13, 2016 03:39 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून नदीपात्रात बांधण्यात आलेला विठ्ठलवाडी ते वारजे हा रस्ता उखडून टाकण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यानंतर आता पाटबंधारे विभागाकडून

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून नदीपात्रात बांधण्यात आलेला विठ्ठलवाडी ते वारजे हा रस्ता उखडून टाकण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यानंतर आता पाटबंधारे विभागाकडून महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार निळी आणि लाल पूररेषा निश्चित केली असून या रेषांमध्ये येणाऱ्या सुमारे १६ सोसायट्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आधीच रस्ता उखडल्याने पुढील वर्षापासून नदीच्या पुराच्या धोक्याची टांगती तलवार असतानाच महापालिकेच्या नोटिशीमुळे नागरिकांमध्ये भीती व असंतोषाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, महापालिकेकडून बजावण्यात आलेल्या नोटिशीनुसार, या सोसायट्यांकडून त्यांची मान्यतेची कागदपत्रे मागविण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. सिंहगड रस्त्याला पर्यायी असलेल्या या रस्त्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले होते. मात्र, महापालिकेकडून हा रस्ता नदीपात्रात बांधण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून पर्यावरणप्रेमींकडून राष्ट्रीय हरित लावादाकडे त्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, लवादाने हा रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर महापालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने लावादाचा निर्णय कायम ठेवून रस्ता काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, काही महिन्यांपासून हा रस्ता काढण्याचे काम सुरू होते. या निकालातच न्यायालयाकडून पाटबंधारे पूररेषा निश्चित करावी तसेच निळ्या रेषेत येणारे अडथळे काढून टाकण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे महापालिकेकडून निळया रेषेतील ७, तर लाल रेषेत येणाऱ्या ९ सोसायट्यांना मान्यतेची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण या नोटिसांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सोमवारी (दि. ११) बैठक घेऊन महापालिकेच्या या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरातील बांधकामांना यापूर्वी पाटबंधारे विभागाने दिलेल्या एनओसी तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाची मान्यता असताना अशा प्रकारे नोटीस बजावणे योग्य नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. यापूर्वी पूररेषा निश्चित होती, तर बांधकामांना परवानगी दिली कशी? असा सवाल उपस्थित करीत त्याबाबत लढा देण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, वेळप्रसंगी न्यायालयीन लढा देण्याची तयारीही नागरिकांनी दर्शविली असल्याचे या बैठकीचे आयोजक सोमनाथ गिरी यांनी सांगितले. महापालिकेकडून बजावण्यात आलेल्या नोटिशीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, पूररेषा निश्चित होईपर्यंत महापालिकेने कारवाई करू नये, अशी मागणी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी केली आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यातही पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित केलेली नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. असे असतानाच अशा प्रकारे रहिवाशांना नोटीस देण्यात आल्याने असंतोषाचे वातावरण असून रेषानिश्चितीनंतरच कारवाई करावी, अशी मागणी नागपुरे यांनी केली आहे.