शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला कर्ज योजनेत महापालिकेची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकारने दुसरी कर्ज योजना जाहीर केली. मात्र, योजना जाहीर होऊन महिना झाला, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकारने दुसरी कर्ज योजना जाहीर केली. मात्र, योजना जाहीर होऊन महिना झाला, तरीही अद्याप एकही फेरीवाला त्यात अर्ज करू शकलेला नाही. जाणीव फेरीवाला संघटनेने याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे.

कोरोना टाळेबंदीत आर्थिक नुकसान झालेल्या फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत १० हजार रुपये कर्ज योजना सुरू करण्यात आली. आता ते कर्ज फेडलेल्या फेरीवाल्यांसाठी या योजनेचा दुसरा टप्पा म्हणून २० हजार रुपयांची कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला व राज्याने सर्व महापालिकांना समन्वय म्हणून काम करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीयीकृत बँका, तसेच सहकारी पतसंस्थांनी ही योजना राबवायची आहे.

सरकारचा आदेश आल्यानंतरही महापालिकेने यात काहीही हालचाल केलेली नाही. योजनेसंबंधी ना बँकांना माहिती आहे ना फेरीवाल्यांना. महापालिका प्रशासनाने याबाबत बँका, तसेच फेरीवाल्यांच्या संघटनेची बैठक घ्यायला हवी अशी संघटनांची अपेक्षा आहे. बँकांमध्ये फेरीवाले गेले की त्यांना बँका महापालिकेचे पत्र आणण्याबाबत सांगतात, महापालिकेत चौकशी केली असता अद्याप आदेश नसल्याचे सांगण्यात येते, असे काही फेरीवाल्यांनी सांगितले.

योजनेसाठी समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या महापालिकेतील एका अधिकाऱ्याने अर्जदारांच्या कागदपत्रांची पूर्तता, पात्र फेरीवाले, आधीचे कर्ज फेडलेले फेरीवाले या कामासाठी एजन्सी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली. योजनेची जबाबदारी असणारे अतिक्रमण विरोधी विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी अशी एजन्सी नियुक्त करणार नसल्याचे स्पष्ट केले. फेरीवाल्यांच्या शंका निरसनासाठी क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र अधिकारी नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राकडे तक्रार

“महापालिकेत चौकशी करून फेरीवाले त्रस्त झाले. आधीचे १० हजार रुपये कर्ज फेडलेले ४ हजार फेरीवाले पुण्यात आहेत. त्यांना नवे कर्ज हवे आहे. पण बँकवाले देत नाहीत. आम्ही केंद्रीय मंत्री दुर्गाशंकर व राज्याचे समन्वयक महेश पाठक यांच्याकडे तक्रार केली आहे.”

- संजय शंके, सरचिटणीस, नॅशनल हॉकर्स फेडरेशन

--------------------

आधीच्या योजनेतही महापालिकाच समन्वयक होती, त्यावेळी आम्ही काम केले, मग आता न करण्याचे काहीच कारण नाही. फेरीवाल्यांनी थेट बँकेकडे अर्ज करायचा आहे. तिथे काहीही अडचण आल्यास आम्ही मार्गदर्शनास तयार आहोत.

-माधव जगताप, उपायुक्त व मुख्य समन्वयक, महापालिका.