शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मोबाइल कंपन्यांविरुद्ध पालिका

By admin | Updated: January 9, 2017 02:59 IST

सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला मोबाईल कंपन्यांकडून त्यांच्या टॉवरसाठी मिळकत कर वसूल करता येईल, असा निर्णय दिला

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला मोबाईल कंपन्यांकडून त्यांच्या टॉवरसाठी मिळकत कर वसूल करता येईल, असा निर्णय दिला; मात्र तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करता येईल किंवा नाही हे संबंधित क्षेत्रातील न्यायालयांनी ठरवावे, असे नमूद केल्यामुळे पालिकेला पुन्हा याबाबतची न्यायालयीन लढाई लागणार आहे. पुणे पालिकेची तब्बल ३९४ कोटी रुपयांची थकबाकी मोबाईल कंपन्यांकडे अडकून पडली असून, यामुळे ती वसूल होणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मोबाईल टॉवरना मिळकत कर लागू होतच नाही, असे त्यांचे म्हणणे होते. केंद्रसरकारने सवलत दिल्यामुळे ती सर्वत्र लागू आहे, असा त्यांचा दावा होता. पालिकेने त्यांना मिळकत कर आकारण्यास सुरुवात केल्यानंतर, सर्व मोबाईल कंपन्यांनी प्रथम उच्च न्यायालयात व नंतर थेट सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात दावा दाखल केला.उच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला होता; मात्र त्याला कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. दरम्यानच्या काळात पालिकेने त्यांना मिळकत कर आकारणी सुरूच ठेवली होती. ती वसूलच होत नसल्यामुळे ज्यांच्या मिळकतीवर हे टॉवर आहेत त्या मिळकतधारकांना पालिकेने नोटिसा बजावल्या. त्यांनी मोबाईल कंपन्या व त्यांच्यात झालेल्या कराराची कागदपत्रे पालिकेला सादर केली. त्यात मिळकत कर वगैरेची जबाबदारी मोबाईल कंपन्यांची असेल असे नमूद केलेले असल्यामुळे पालिकेला मिळकतधारकांविरोधात कसलाही कारवाई करता येईना.(प्रतिनिधी)