शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमध्ये होणार बहुभाषिक संमेलन

By admin | Updated: May 26, 2017 06:17 IST

सानेगुरुजींचे ‘आंतरभारती’चे स्वप्न साकार करणारे बहुभाषिक संमेलन लवकरच भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये रंगणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सानेगुरुजींचे ‘आंतरभारती’चे स्वप्न साकार करणारे बहुभाषिक संमेलन लवकरच भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये रंगणार आहे. सरहद संस्थेतर्फे आयोजित विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे कॉफी टेबल बुक मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये संमेलन व्हावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि गीतकार गुलजार यांनी पत्रातून व्यक्त केली होती. देशातील सर्व भाषांचे संयुक्त संमेलन व्हावे, अशी भावनाही त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनात व्यक्त केली होती. हाच धागा पकडून सरहदतर्फे यंदाचे बहुभाषिक संमेलन २३ आणि २४ सप्टेंबर रोजी काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. गुलजार यांनी संमेलनाध्यक्षपद भूषवावे, यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. संमेलनासाठी श्रीनगर हे स्थळ निश्चित करण्यात आले असून, बडगाम, टागोर हॉल यांसह तीन ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. या संदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरच्या राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे.सरहद संस्थेतर्फे पहिले बहुभाषिक संमेलन पंजाबमधील घुमान येथे आयोजित करून हा हेतू प्रत्यक्षात उतरवण्यात आला. यंदाचे बहुभाषिक संमेलन काश्मीरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे ‘घुमान बहुभाषा संमेलन’ असे नामकरण करण्यात आल्याचे सरहदचे संजय नहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. साहित्यातील भाषेच्या भिंती दूर होऊन ते एकरूप व्हावे, वाचकांना सर्व भाषांमधील साहित्याचा आस्वाद घेता यावा यासाठी सर्व भाषांंधील साहित्यिक, लेखकांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून सातत्याने व्यक्त होत असते. याबाबत माहिती देताना संजय नहार म्हणाले, ‘‘संमेलनासंदर्भात काश्मीरमधील पर्यटन विभाग आणि कल्चरल अ‍ॅकॅडमी यांच्याशी बोलणी सुरू आहेत. पर्यटन विभागाचे संचालक मेहमूद शहा यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरला जाऊन राज्यपाल तसेच सरकारशी अधिकृत बोलणी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. काश्मीरमधील स्थानिक माणसाचा खराखुरा उदारमतवादी चेहरा देशासमोर यावा, हाच या संमेलनामागचा उद्देश आहे. यंदाच्या संमेलनात राष्ट्रीय ऐक्य, भाषांमधील देवाणघेवाण आदी विषयांचा परिसंवादात समावेश करण्यात येणार असून, समृद्ध विचारमंथन होईल, अशी अपेक्षा आहे.’’