शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

श्रीनगरमध्ये होणार बहुभाषिक संमेलन

By admin | Updated: May 26, 2017 06:17 IST

सानेगुरुजींचे ‘आंतरभारती’चे स्वप्न साकार करणारे बहुभाषिक संमेलन लवकरच भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये रंगणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सानेगुरुजींचे ‘आंतरभारती’चे स्वप्न साकार करणारे बहुभाषिक संमेलन लवकरच भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये रंगणार आहे. सरहद संस्थेतर्फे आयोजित विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे कॉफी टेबल बुक मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये संमेलन व्हावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि गीतकार गुलजार यांनी पत्रातून व्यक्त केली होती. देशातील सर्व भाषांचे संयुक्त संमेलन व्हावे, अशी भावनाही त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनात व्यक्त केली होती. हाच धागा पकडून सरहदतर्फे यंदाचे बहुभाषिक संमेलन २३ आणि २४ सप्टेंबर रोजी काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. गुलजार यांनी संमेलनाध्यक्षपद भूषवावे, यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. संमेलनासाठी श्रीनगर हे स्थळ निश्चित करण्यात आले असून, बडगाम, टागोर हॉल यांसह तीन ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. या संदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरच्या राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे.सरहद संस्थेतर्फे पहिले बहुभाषिक संमेलन पंजाबमधील घुमान येथे आयोजित करून हा हेतू प्रत्यक्षात उतरवण्यात आला. यंदाचे बहुभाषिक संमेलन काश्मीरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे ‘घुमान बहुभाषा संमेलन’ असे नामकरण करण्यात आल्याचे सरहदचे संजय नहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. साहित्यातील भाषेच्या भिंती दूर होऊन ते एकरूप व्हावे, वाचकांना सर्व भाषांमधील साहित्याचा आस्वाद घेता यावा यासाठी सर्व भाषांंधील साहित्यिक, लेखकांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून सातत्याने व्यक्त होत असते. याबाबत माहिती देताना संजय नहार म्हणाले, ‘‘संमेलनासंदर्भात काश्मीरमधील पर्यटन विभाग आणि कल्चरल अ‍ॅकॅडमी यांच्याशी बोलणी सुरू आहेत. पर्यटन विभागाचे संचालक मेहमूद शहा यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरला जाऊन राज्यपाल तसेच सरकारशी अधिकृत बोलणी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. काश्मीरमधील स्थानिक माणसाचा खराखुरा उदारमतवादी चेहरा देशासमोर यावा, हाच या संमेलनामागचा उद्देश आहे. यंदाच्या संमेलनात राष्ट्रीय ऐक्य, भाषांमधील देवाणघेवाण आदी विषयांचा परिसंवादात समावेश करण्यात येणार असून, समृद्ध विचारमंथन होईल, अशी अपेक्षा आहे.’’