शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

रोहिड खोऱ्याचा मुकुटमणी किल्ले रोहिडेश्वर; जल व्यवस्थापनाचा उत्तम नमुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 09:55 IST

सह्याद्रीच्या डोंगररांगेमध्ये भोर ते महाबळेश्वर पट्ट्यातील प्रमुख किल्ल्यांमध्ये रोहिडेश्वरचा समावेश होतो. भोर तालुक्यातील राेहिड  खोऱ्याचे हे मुख्य ठाणे. यादवकाळात उभारलेल्या या किल्ल्याचे बुरूज आत्ताही भक्कम आहेत.

नामदेव मोरे

पुणे - जिल्ह्यातील भोरपासून जवळ असलेल्या राेहिडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असेदेखील संबोधले जाते. भोर - महाबळेश्वर डोंगररांगेतील कमलगड, केंजळगड व रायरेश्वरच्या पट्ट्यात या किल्ल्याचा समावेश होतो. पुणे जिल्ह्यातील मावळांमध्ये हिरडस मावळचा हा भाग. इतिहासात प्रसिद्ध असलेल्या बांदल यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. किल्ल्याबरोबर बांदल सेनाही स्वराज्यात सहभागी झाली. यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. वर्षभर किल्ल्यावर सहजपणे जाता येते. पायथ्यापासून किल्ल्यावर एक तासात पोहोचता येते. किल्ल्यावर व मार्गावर पर्यटकांसाठी बैठक व्यवस्थेची सोय केली आहे. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजावर गणेश पट्टी पाहायला मिळते. पुरातन अवशेष व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यावर सर्व ऋतूंमध्ये इतिहासप्रेमींची पावले वळू लागली आहेत.

गडावर पुरातन वास्तूचे अनेक अवशेष पाहायला मिळतात. या किल्लेदाराचे निवासस्थान, भैरोबाचे मंदिर असून, समोर तलाव आहे. बुरुजामध्ये चोर दरवाजाही पाहायला मिळतो. येथील भूमिगत टाक्यात वर्षभर पाणी असते. रोहिडेश्वर किल्ला जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे. पाण्याची भरपूर टाकी गडावर पाहायला मिळतात. गडावरील बांधकाम करण्यासाठी तयार केलेला चुन्याचा घाणा व इतर अवशेषही पाहता येतात. साधारणत: एक ते  दीड तासात गडाची भटकंती पूर्ण होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना गडावर सहज चालत जाता येते.

दोन महान योद्ध्यांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांशी लढाई करून रोहिडेश्वर स्वराज्यात आणला. लढवय्या बांदल सेनेलाही स्वराज्यात सहभागी करून घेण्यात आले. याच किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांची शिवाजी महाराजांशी पहिली भेट झाल्याचे मानले जाते. पुरंदरच्या तहामध्ये हा किल्लाही मोघलांना देण्यात आला होता. १६७० मध्ये तो पुन्हा स्वराज्यात आणला. पुढे भोर संस्थानाच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता.

काय पहाल? : रोहिडेश्वर किल्ल्यावरील दोन दरवाजे. किल्ल्यावरील गणेश पट्टी, शिलालेख, चोर दरवाजा. भक्कम बुरूज, पुरातन वास्तूचे अवशेष, भुयारी टाकी, तलाव, मंदिर, पाण्याची टाकी पाहायला मिळतात. गडावरून कमलगड, केंजळगड, रायरेश्वरचा परिसर पाहायला मिळतो. 

कसे जाल? : गडावर जाण्यासाठी एसटी व खासगी वाहनांनी बाजारवाडी गावापर्यंत जाता येते. तेथून एक तासात गडावर पोहोचता येते. चिखलावडे गावाच्या बाजूनेही गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु, हा मार्ग थोडा कठीण आहे.