शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मुहूर्त बंडखोरीचा!

By admin | Updated: September 27, 2014 07:21 IST

कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती फुटल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संधीतून आजचा दिवस पक्षांतरांचा ठरला

पुणे : कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती फुटल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संधीतून आजचा दिवस पक्षांतरांचा ठरला. इच्छुकांनी आपल्या पक्षातून संधी न मिळाल्याने दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला.जिल्हा बॅँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश करून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूर तालुक्यात आता हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे आणि भाजप-रासप युतीचे जगदाळे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. गेल्या वेळी जगदाळे यांनी अपक्ष म्हणून लढणारे भरणे यांना साथ दिली होती. याही वेळी महाआघाडीच्या माध्यमातून भरणे आणि जगदाळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, आघाडी तुटल्याने भरणे यांना थेट राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार आहे. पुरंदरमधून राष्ट्रवादीचे राहुल शेवाळे यांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे शिवतारे यांच्या विरोधात शेवाळे लढू शकतील. राष्ट्रवादीकडून बहुसंख्य इच्छुक असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी ऐन वेळी उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.पर्वती मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिन तावरे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तावरे यांनी गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. शिवसेनेकडून जुन्नरमधून आशाताई बुचके यांना उमेदवारी जाहीर झाल्याने येथील इच्छुक माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके यांना भाजपतर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. माजी जि.प. सदस्य प्रसन्न डोके, शिवसेनेतील जुन्नरचे माजी नगराध्यक्ष सुनिल मेहेर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खेडमध्ये परिवर्तन आघाडी स्थापण्यात पुढाकार घेणारे शरद बुट्टे-पाटील हे युती फुटल्याचा निर्णय जाहीर होताच भाजपामध्ये गेले आहेत. शरद बुट्टे-पाटील हे राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषदेचे सदस्य व कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सभापती होते. तर, राष्ट्रवादीचेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वेळी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली होती. दिलीप मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली होती. मावळमधील माऊली दाभाडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. शिरूरमधून राष्ट्रवादीचे मंगलदास बांदल हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. गेल्या वेळी बांदल अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. भाजपमधून राष्ट्रवादीत व पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्री पलांडे यांनीही शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. (प्रतिनिधी)