शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीकरांना मैलायुक्त पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: May 3, 2017 01:47 IST

अलंकापुरीतील गहन बनत चाललेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीची तहान भागविण्यासाठी आंद्र्रा धरणातून २०० क्युसेक्सने

शेलपिंपळगाव : अलंकापुरीतील गहन बनत चाललेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीची तहान भागविण्यासाठी आंद्र्रा धरणातून २०० क्युसेक्सने इंद्रायणीत पाणी सोडण्यात आले आहे. मात्र,आळंदीकर कारभारी व शिवसेना आपल्याच विनंतीने आळंदीकरांच्या पिण्यासाठी पाणी सोडल्याचा दावा करत आहे. प्रत्यक्षात आळंदीच्या धरणात अद्याप आंद्र्राचे पाणी आले नाही. त्यामुळे आळंदीकरांच्या बंद नळाला मैलायुक्तच पाणी येत आहे. पिंपरी-चिंचवडच्या चिखली, तळवडे हद्दीतून पिंपरी-चिंचवडचे मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत सोडल्याने आळंदीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील बनत आहे. सध्या आळंदीतील इंद्रायणी कोरडी पडल्याने पाणीपुरवठ्याच्या बंधाऱ्यावर संपूर्णपणे मैलायुक्त गाळ साचला आहे. त्यातूनच अपुऱ्या यंत्रणेवर पाणी शुद्ध करावे लागत असल्याने मागील ८ दिवसांपासून आळंदीत नळाला मैलायुक्त पिण्याचे पाणी येत आहे. नळाचे पाणी पिण्यायोग्य तर सोडा आंघोळीच्याही लायकीचे नसल्याचे चित्र आहे. प्रभारी मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आदींच्या प्रयत्नाने पाण्याचा थोडाफार रंग बदलला होता. परंतु चव मात्र तीच असल्याने पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी विकतचे पाणी वापरण्याची पाळी आळंदीकरांवर आली आहे. नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या पुणे शाखेला शनिवारी (दि. २९) पत्रव्यवहार करून आळंदीला वडिवळे अथवा जाधववाडी धरणातून पाणी सोडण्याबाबत ई-मेल केल्याची माहिती पत्रकारांना पत्राद्वारे दिली होती. प्रत्यक्षात २५ तारखेलाच आंद्र्रा धरणातून पाणी सोडले होते. मात्र, शिवसेना पाणी सोडण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला असल्याचे सोशल मीडियावर सांगत आहे. आळंदीत नागरिकांनी नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. पिण्याचे पाणी आळंदीकरांना मिळवून देऊ, यासाठी सेना-भाजपा यांनी दोन्हीकडून दावा केला जात होता. (वार्ताहर)मावळ पाटबंधारे विभागातील शाखाधिकारी ए. आर. हांडे यांना विचारले असता, २५ एप्रिलला आंद्रा धरणातून आळंदी परिसरातील शेतीसाठी पाणी सोडले आहे. याबाबत मोशी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडण्याची सूचना आली होती. सुमारे दोनशे क्युसेक्स पाणी सोडले असून मंगळवारी रात्रीपर्यंत आळंदीत पाणी पोहोचेल. चिंबळी, मोई, धानोरे, मरकळ, चऱ्होली या भागातील शेतकऱ्यांबरोबर आळंदीच्या पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होईल, असे हांडे यांनी सांगितले.