शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

राज्य सरकारने मागणीपत्र पाठवले तरच एमपीएससी घेणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पदांसाठीचे मागणीपत्र जर राज्य सरकारने पाठवले तर याच वर्षी परीक्षा घेण्याची तयारी ...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पदांसाठीचे मागणीपत्र जर राज्य सरकारने पाठवले तर याच वर्षी परीक्षा घेण्याची तयारी एमपीएससीने ट्विट करून दर्शविली आहे. यामुळे राज्य सरकारची जबाबदारी वाढली असून रिक्त पदांचे मागणीपत्र तत्काळ एमपीएससीला पाठवावेत. अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

‘शासनाकडून ज्या पदांची मागणीपत्रे २०२१ या वर्षाकरिता प्राप्त होतील. त्या पदांकरिता परीक्षा २०२१ मध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल व त्यानुसार उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात येईल.’ या आशयाचे एमपीएससीने ट्विट केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली तशी आता राज्य सरकारने जबाबदारी वाढली आहे. जर सरकारने मागणीपत्र तत्काळ पाठवले नाही तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी एमपीएससीने २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबर २०२१ अखेरीस जाहीर केले जाईल. असे ट्विट केले होते. यावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. या बाबतचे वृत्तदेखील ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. यावर आता एमपीएससीने परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र अप्रत्यक्षपणे जबाबदारी राज्य सरकारवर ढकली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच २०२१ च्या परीक्षा जर घेतल्या तर अनेक विद्यार्थ्यांनी संधी मिळू शकते. असे म्हणणे आहे.

३१ जुलैपर्यंत एमपीएससीचे रिक्त सदस्य भरली जाणार होती. हा दिलेला शब्द पाळला गेला नव्हता. त्यामुळे सर्वच स्तरातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत सगळ्या विभागांचे रिक्त पदांचे मागणी पत्र पाठवून जाहिरात काढणार आहेत. त्या आधीच एमपीएससीने वेळापत्रक नोव्हेंबर अखेरीस जाहीर करणार असल्याचे सांगितले. आता पुन्हा याच वर्षी परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली आहे. यावरून एमपीएससी आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ नाही की, हे ट्विट करून नेमके कोणाला काय साध्य करायचे आहे. अशी शंकादेखील विद्यार्थ्यांनी उपस्थित केली आहे.

कोट

अजून स्वप्नील लोणकर नको असतील तर सरकारने मागणीपत्र पाठवणे गरजेचे आहे. आज प्रत्येक विद्यार्थी नैराश्यात आहे. मानसिक, शारीरिक आरोग्य धोक्यात आलं आहे. आर्थिक चणचण तर खूप आहे. कोरोनामध्ये आमच्यापैकी कितीतरी विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय गमावले आहे. विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

- प्रशांत इंगळे

आम्ही आमच्या पालकांना अजून किती वेळ मागणार आहोत? परीक्षाच वेळेवर होणार नसतील ते कसे साथ देतील आम्हाला? आम्ही रात्रंदिवस घेतलेली मेहनत,तो अभ्यास वाया जाऊ देऊ नका.

- वैभव गाजरे पाटील

चौकट

महिला बालविकास, आदिवासी विभाग, समाजकल्याण, मुद्रांक व नोंदणी शुल्क विभाग, राज्यसेवा आणि सर्व दुय्यम सेवा परीक्षांचे मागणीपत्र त्वरित पाठवून लवकरात लवकर या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात. अन्यथा आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही, असा अल्टिमेटमच या उमेदवारांकडून महाविकास आघाडीला दिला आहेच.