शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

एमपीएससी नोव्हेंबर अखेरीस परीक्षांचे वेळापत्रक करणार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:17 IST

पुणे : उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सर्व रिक्त पदे ३१ जुलै अखेर भरणार असे जाहीर केले होते. या घोषणेमुळे स्पर्धा ...

पुणे : उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सर्व रिक्त पदे ३१ जुलै अखेर भरणार असे जाहीर केले होते. या घोषणेमुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण होते. आज ना उद्या कोणत्या तरी पदाची जाहिरात येईल आणि परीक्षा देता येईल, अशी अशा विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. मात्र एमपीएएससी २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबर २०२१ अखेरीस जाहीर करणार असल्याचे ट्विट केले आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नाराजी पसरली असून सरकारविरोधी संतपाची भावना आहे.

यापूर्वी शेवटची जाहिरात २०१९ मध्ये आली होती. त्यानंतर कोणतीही नवीन जाहिरात काढण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन वर्षे वाया गेली आहेत. नोव्हेंबरमध्ये वेळापत्रक जाहीर करुन विद्यार्थ्यांचा अजून एका वर्षाचा कालावधी वाया जाणार आहे.

२०२० आणि २०२१ या वर्षात भरतीचा झाली नाही. स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर तरी सरकारला जाग येईल असे वाटले होते. मात्र केवळ आश्वासने देऊन या महाफेकी सरकारने विद्यार्थ्यांना वेड्यात काढले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

राज्य सरकारने १५००० जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. त्याच काय झाले? ३० सप्टेंबरपर्यंत सगळ्या विभागांचे रिक्त पदांचे मागणी पत्र पाठवून जाहिरात काढणार होते. त्या आधीच एमपीएससीने वेळापत्रक नोव्हेंबर अखेरीस जाहीर ककरणार असल्याचे सांगितले. यावरून एमपीएससी आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या विळख्यात २१ ते ३० या वयोगटातील तरुणपिढी अडकलेली आहे. सामाजिक अडचण, आर्थिक नुकसान, नैराश्य, मानसिक तणाव या व आदी गोष्टींचा तरुण सामना करीत आहे. तसेच कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. तर काहींना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. नोव्हेंबर अखेरीस जाहीर झाले तर परीक्षा थेट सहा महिन्यानंतर होतील. यावरून सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काही देण-घेणे नसल्याचे दिसून येत असल्याच्या आरोप स्पर्धा परीक्षेतून होत आहे.