शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

आतातरी ‘एमपीएससी’ने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:11 IST

अमोल अवचिते पुणे : राज्य सरकारच्या विविध विभागातील रिक्त पदांची भरती करावी. या आशयाचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) ...

अमोल अवचिते

पुणे : राज्य सरकारच्या विविध विभागातील रिक्त पदांची भरती करावी. या आशयाचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) पाठविले जाते. त्यानुसार एमपीएससी वेळापत्रकानुसार जाहिरात प्रसिध्द करून भरती प्रक्रिया राबविते. मात्र सरकारकडून २०२१ या वर्षातील भरती बाबतचे मागणीपत्र मराठा आरक्षणाच्या प्रलंबित निर्णयामुळे पाठविले जात नव्हते, असे सांगून आता आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे आता तरी २०२१ मधील एमपीएससीने वेळेपत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससी तसेच सरळ सेवा भरती प्रक्रिया झाली नाही. जी भरती झाली ती आरक्षणाचा प्रश्न, न्यायालयात सुरू झालेले दावे, कोरोना तसेच इतर कारणांमुळे रखडली आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असल्याने सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा विचार करून भरती प्रक्रिया राबवावी. तसेच राज्य सरकारने विविध विभागांतील रिक्त जागांची माहिती घेऊन भरती करण्यासाठी मागणीपत्र एमपीएससीला पाठवावी. जेणेकरून तरुणांमध्ये आलेली मरगळ दूर होऊन एक उत्साहाचे वातावरण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात निर्माण होऊ शकेल. एकूणच भरती प्रक्रियेला झालेल्या दिरंगाईमुळे मराठा समाजासह इतर समाजातील तरुणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असे विद्यार्थ्यांचे मत आहे.

स्पर्धा परीक्षेच्या विळख्यात २१ ते ३० या वयोगटातील तरुण पिढी अडकलेली आहे. यामुळे समाजाचे तसेच राज्याचे मोठे नुकसान होत आहे. सामाजिक अडचण, आर्थिक नुकसान, नैराश्य, मानसिक तणाव या व आदी गोष्टींचा तरुण सामना करीत आहे. तसेच कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. जर पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले तर चैतन्याचे वातावरण निर्माण होईल. तसेच नोकरीची आस लावून बसलेल्यांना दिलासा मिळेल, असे विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले.

कोट

२०२१च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक येईल, मानसिक ताण कमी होईल व जे विद्यार्थी मागील ४ ते ५ वर्षांपासून परीक्षांची तयारी करीत आहेत, त्यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांची स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. लवकरात लवकर वेळापत्रकासाठी एमपीएससीकडे मागणीपत्र पाठविण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.

- महेश बडे, एमपीएससी स्टुडंटस राईटस

चौकट

४-५ लाख कामगारांचे भविष्य अडचणीत

स्पर्धा परीक्षाचे वेळापत्रक घोषित न होणे, तसेच रखडलेल्या सरळसेवाच्या परीक्षा न होणे, रखडलेले निकाल घोषित न होणे या सर्व गोष्टींमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसमोर भविष्याविषयी अंधकारमय चित्र तयार झाले आहे. या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या व्यवस्थेतून अंदाजे जवळपास ४-५ लाख कामगारांचे भविष्य अडचणीत आले आहे.