शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचा निर्णय उमेदवारांचे नुकसान करणारा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:17 IST

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतून पदांवर निवड करताना मुलाखतीपूर्वी पदासाठी पसंती दर्शवावी ...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतून पदांवर निवड करताना मुलाखतीपूर्वी पदासाठी पसंती दर्शवावी लागते. गुणांनुसार त्या पदासाठी निवड केली जाते. मात्र, जाहिरातीमध्ये अपेक्षित पद नसल्याने ज्या उमेदवाराने पसंती क्रम दर्शविला नाही, तर इतर उमेदवाराला निवडीची संधी मिळते. यावर एमपीएससीने नवीन आदेश काढून पसंती क्रम दिला नसला तरी जाहिरातीत दिलेल्या पदानुसार निवड केली जाईल, असे सांगितले आहे. या निर्णयाने ज्या उमेदवाराची पद घेण्याची इच्छा नसतानादेखील त्याची निवड होऊन इतर उमेदवाराची संधी हुकणार आहे. असे उमेदवरांचे म्हणणे असून हा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

राज्यसेवा २०१९ ची भरती प्रक्रियेमध्ये एमपीएससीकडून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण घातला जात आहे. शासनाच्या १५ जुलैच्या अध्यादेशानुसार एमपीएससी नव्याने मुलाखती घेताना १२ ॲागस्ट रोजी प्रसिद्धीपत्रक काढले, त्यानुसार जे उमेदवार पसंती क्रम भरणार नाहीत त्यांचा अंतिम शिफारशीसाठी विचार करणार नाही, असे सांगण्यात आले होते. २०१९ मध्ये बरेच उमेदवार अगोदरच शासकीय सेवेत गट अ आणि गट ब पदांवर रुजू आहेत. त्यामुळे त्यांनी ४० ते ५० उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी पसंती क्रम दर्शविला नाही. ज्या पदासाठी ज्यांनी पसंतीक्रम भरले नाहीत, त्यातील बरेच उमेदवार हे ते अगोदरच त्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे पसंती क्रम दर्शविला किंवा नाही दर्शविला तरी एमपीएससी आता जाहिरातीत दिलेल्या पदांच्या क्रमानुसार निकाल लावणार आहे. एमपीएससीने १२ ॲागस्टचा नियम ८ सप्टेंबर २०२१ च्या घोषणापत्रानुसार बदलला. त्यामुळे जवळपास ४० ते ५० उमेदवारांचे नुकसान होऊन ती पदे वाया जातील. ज्यांची इच्छा नाही किंवा त्यांना पद नकोच आहे, अशा उमेदवारांचा अंतिम शिफाशीसाठी विचार करण्यात येऊ नये. त्याऐवजी इतर उमेदवारांचा विचार करून त्यांना संधी द्यावी. एमपीएससीने नव्याने घोषणापत्रकामध्ये बदल करून ज्यांनी पसंती दर्शविली नाही, फक्त त्यांच्याकडूनच पसंती मागवून घ्यावी. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करावा, अशी मागणी उमेदवरांची आहे.

-----------------

ज्या पदावर सध्या कार्यरत आहे किंवा जे पद आधीच्या परीक्षेतून मिळाले आहे. त्याच पदावर पुन्हा निवड होऊ नये किंवा त्याखालील पद मिळू नये म्हणून पसंती क्रम दिला नाही. जर पसंती क्रम दिला तर नक्कीच जाहिरातीत दिलेल्या पदावर निवड होईल. जे की त्या पदावर रुजू होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या उमेदवारांना मिळणारी संधी हुकेल. सामाजिक भावनेतून असा निर्णय अनेक नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी घेतला आहे.

- महेश पांढरे (नवनियुक्त गट विकास अधिकारी)