शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

खासदारांनी दिशाभूल करू नये : वळसे-पाटील

By admin | Updated: October 6, 2016 03:38 IST

खासदारांनी श्रेय घेण्याच्या वादामध्ये सत्य माहिती दडवून आदिवासी बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आदिवासी विकास विभागाने २९ सप्टेंबर रोजी

घोडेगाव : खासदारांनी श्रेय घेण्याच्या वादामध्ये सत्य माहिती दडवून आदिवासी बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आदिवासी विकास विभागाने २९ सप्टेंबर रोजी काढलेल्या शुद्धिपत्रकातून वन हक्क कायद्यांतर्गत जमिनी न मिळालेल्या शेतकऱ्यास पडकई योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, खासदारांनी श्रेय घेण्यासाठी चुकीची माहिती प्रसिद्ध करून या योजनेतील दारिद्र्यरेषेची अट शिथिल केल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. विशेष केंद्रीय साहाय्य निधीतून पडकई योजनेद्वारे शेतकऱ्यांना नवीन भातखाचरे निर्माण करण्याकरिता निधी दिला होता. या योजनेसाठीचा लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असावा, अशी अट मागील वर्षी राज्य शासनाने घातल्याने बहुतांशी आदिवासीबांधव या योजनेच्या लाभापासून वंचित राहू लागले. तसेच दोन वर्षांपूर्वी पडकईची कामे केलेल्या आदिवासी शेतकऱ्यांचे पैसेदेखील या अटीमुळे अडकून पडले. ही अट शिथिल व्हावी, यासाठी दिलीप वळसे-पाटील, शिवाजीराव आढळराव -पाटील, किसन महासभा, शाश्वत संस्था असे सगळेच जण प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)पडकई योजनेतील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी अट वगळण्याची माझी आपली मागणी होती. नवीन आलेल्या शासन निर्णयात वन हक्क कायद्यांतर्गत जमिनी प्राप्त झालेल्या लाभार्थींसाठी दारिद्र्यरेषेखालील अट शिथिल केल्याची बाब लक्षात आली नव्हती. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर आपण आज ५ आॅक्टोबर रोजी आदिवासी विभागाचे प्रधान सचिव रामगोपाळ देवारा यांची भेट घेऊन त्यांना याबाबत योग्य तोगडा काढण्याची मागणी केली. - शिवाजीराव आढळराव पाटील, खासदारनिर्णय आदिवासी शेतकऱ्यांसाठी घातक ४याबाबत किसान महासेभेनेदेखील निवेदन प्रसिद्ध करून २८ सप्टेंबर रोजी निघालेला शासननिर्णय हा आदिवासी शेतकऱ्यांसाठी घातक आहे. पडकई योजनेत शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे शासनाने त्वरित वितरित करावेत व दारिद्र्यरेषेची अट शिथिल करावी. ४यासाठी संघटनेने यापूर्वी अनेक आंदोलने केली आहेत. तसेच नुकतेच विविध मागण्यांसाठी आदिवासी विकासमंत्र्यांच्या घराला घेराव घातला होता. त्या वेळीदेखील ही मागणी लावून धरली व आदिवासी विकास विभागाच्या सचिवांनी ७ आॅक्टोबर रोजी आदिवासी मंत्र्यांसमवेत यासंदर्भात आयोजित बैठकीत याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे.