शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबपुष्प देऊन आंदोलनाला सुरुवात

By admin | Updated: June 2, 2017 01:59 IST

भाजपा सरकारच्या ३ वर्षांच्या काळात शेतकरी मेटकुटीला आला असतानाच गेल्या १ महिन्यात सधन समजणाऱ्या जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : भाजपा सरकारच्या ३ वर्षांच्या काळात शेतकरी मेटकुटीला आला असतानाच गेल्या १ महिन्यात सधन समजणाऱ्या जिल्ह्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यात आजपर्यंत सर्वाधिक आत्महत्या फडणवीस सरकारच्या काळात होऊनही सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तर देतच नाही शिवाय कर्जमाफीही करत नसल्याने शेतकऱ्यांनी उभारलेल्या संपास शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गर्दे यांनी केले.शेतकरी संघटनेच्या वतीने कोरेगाव भीमा आठवडे बाजारमध्ये विक्रेते व शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शांततेच्या मार्गाने ‘शेतकरी संप’ आंदोलनास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांना गुलाबपुष्प देत दुकाने बंद करण्यास सांगण्यात येत होते. या वेळी उपजिल्हाध्यक्ष सुहास काटे, लक्ष्मण रांजणे, शिरुर तालुकाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, बापुसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष दत्तात्रय भुजबळ, चंद्रकांत धुमाळ, विशाल भुजबळ, सुभाष धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, किसन पलांडे, गणेश दौंडकर, सत्यवान धुमाळ उपस्थित होते.शरद गर्दे म्हणाले, ‘१ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून तालुक्यातील २० दूध डेअरी शांततेच्या मार्गाने बंद करण्यात आल्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ कधी येणार?शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची अजून वेळ आली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी करण्यासाठी वेळ येणार तरी कधी, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद गर्दे यांनी केली.