शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गुलाबपुष्प देऊन आंदोलनाला सुरुवात

By admin | Updated: June 2, 2017 01:59 IST

भाजपा सरकारच्या ३ वर्षांच्या काळात शेतकरी मेटकुटीला आला असतानाच गेल्या १ महिन्यात सधन समजणाऱ्या जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : भाजपा सरकारच्या ३ वर्षांच्या काळात शेतकरी मेटकुटीला आला असतानाच गेल्या १ महिन्यात सधन समजणाऱ्या जिल्ह्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यात आजपर्यंत सर्वाधिक आत्महत्या फडणवीस सरकारच्या काळात होऊनही सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तर देतच नाही शिवाय कर्जमाफीही करत नसल्याने शेतकऱ्यांनी उभारलेल्या संपास शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गर्दे यांनी केले.शेतकरी संघटनेच्या वतीने कोरेगाव भीमा आठवडे बाजारमध्ये विक्रेते व शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शांततेच्या मार्गाने ‘शेतकरी संप’ आंदोलनास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांना गुलाबपुष्प देत दुकाने बंद करण्यास सांगण्यात येत होते. या वेळी उपजिल्हाध्यक्ष सुहास काटे, लक्ष्मण रांजणे, शिरुर तालुकाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, बापुसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष दत्तात्रय भुजबळ, चंद्रकांत धुमाळ, विशाल भुजबळ, सुभाष धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, किसन पलांडे, गणेश दौंडकर, सत्यवान धुमाळ उपस्थित होते.शरद गर्दे म्हणाले, ‘१ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून तालुक्यातील २० दूध डेअरी शांततेच्या मार्गाने बंद करण्यात आल्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ कधी येणार?शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची अजून वेळ आली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी करण्यासाठी वेळ येणार तरी कधी, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद गर्दे यांनी केली.