शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी आंदोलन : डॉ़ राजेंद्र सिंह; पुण्यात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:57 IST

साडेतीन वर्षांनंतर ठोस काहीच न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे, असे जलतज्ज्ञ व जलबिरादरी या जलचळवळीचे प्रणेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी रविवारी पुण्यात जाहीर केले.

ठळक मुद्देडॉ. राजेंद्र सिंह यांना चारित्र्य प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा १६ वा ‘राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन जलप्रदूषणविरोधी व जलजागृतीची चळवळ उभारावी : राजेंद्र सिंह

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी नमामी गंगा योजनेची घोषणा केली़ या घोषणेमुळे आशा पल्लवीत झाल्या होत्या; परंतु आता साडेतीन वर्षांनंतर ठोस काहीच न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे, असे जलतज्ज्ञ व जलबिरादरी या जलचळवळीचे प्रणेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी रविवारी पुण्यात जाहीर केले.पाणी अडवणे, साठविणे आणि जिरविणे, याबाबत डॉ. राजेंद्र सिंह यांनी केलेल्या कार्याबद्दल चारित्र्य प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा १६ वा ‘राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार’ त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सुरेश मेहता, उपाध्यक्ष श्रीधर गायकवाड, पुणे पीपल्स को. आॅप. बँकेचे उपाध्यक्ष सुभाष नडे, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया व किशोर धारिया आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना चारित्र्य उपासक छात्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डॉ़ राजेंद्र सिंह म्हणाले, गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता़ हा निधीही उपलब्ध झाला. मात्र, त्यापैकी केवळ साडेतीन टक्केच निधी खर्च करण्यात आला. याप्रकरणी कॅगसह अनेक संस्थांनी ताशेरेही ओढले आहेत़ सध्या देशात खोटी कामे आणि आश्वासनांबाबत रेटून बोलले जात आहे़ देशात खºयाचे खोटे आणि खोट्याचे खरे बोलण्याची हुशारी या देशात यापूर्वी कधीही दिसली नव्हती, अशी टीका यांनी केली़ आपण आजपर्यंत लोकसहभागातून जलसंधारणाची ११ हजार ८०० कामे केली आहेत़ त्यानुसार महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन जलप्रदूषणविरोधी व जलजागृतीची चळवळ उभारावी, असे राजेंद्र सिंह यांनी सांगितले़ 

लग्न झालेल्या शिक्षकाकडेच पाठवाडॉ. साळुंखे यांच्या जीवनाबद्दल सांगताना शरद पवार यांनी त्यांच्या पत्नीचा उल्लेख केला. पवार म्हणाले, साळुंखे यांनी शिकवणीला आलेल्या मुलीशी लग्न करण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. त्यामुळे पालकांनी मुलींना शिकवणीला पाठविताना लग्न झालेल्या शिक्षकाकडेच पाठवा, असा गमतीशीर सल्लाही पवारांनी दिला.

दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्प पुरेसा नाही. तर मोठी धरणे ही फक्त टक्केवारी व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आहेत. त्याची कामे कधीच पूर्ण होत नाहीत, त्यामध्ये पर्यावरण व शेतकऱ्यांचेच नुकसान होते. म्हणूनच जलसंधारणाबरोबरच पाण्याचे कायमस्वरूपी शास्त्रीय पद्धतीने नियोजन केले पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न केले नाहीत, तर महाराष्ट्राचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही़ - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPuneपुणे