शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

शेतीपंपांची वीज खंडित केल्यास आंदोलन

By admin | Updated: April 8, 2016 00:55 IST

उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा आठ तासांपेक्षा कमी केला अथवा खंडित केल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा आठ तासांपेक्षा कमी केला अथवा खंडित केल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे उपसभापती नारायण वीर, कर्मयोगीचे संचालक वामनराव सरडे, बिभीषण बोंगाणे, अंकुश पाडुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उजनी धरणातील असणारे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र जलसंपत्ती विभाग प्राधिकरणाच्या ६ जानेवारीच्या उजनी धरणाच्या अचल साठ्यातील पाण्याचा सिंचनासाठी वापर करू नये, या निर्देशाचा आधार घेऊन सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक यांनी उजनी जलाशयावरील पुणे जिल्ह्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र देऊन, पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे, असे अंकुश पाडुळे म्हणाले.उजनी धरणात सद्यस्थितीला ४७ टीएमसी पाणी आहे. सोलापूर व पंढरपूर भागात पिण्यासाठी साडेचार टीएमसी सोडले, तरी ४३ टीएमसी पाणी शिल्लक राहते. इंदापूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या व जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्तीत जास्त दोन ते अडीच टीएमसी पाणी लागणार आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत आत्ताची व पुढील दोन महिन्यांतील परिस्थिती अधिक गंभीर आहे. दुष्काळ तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती विभाग प्राधिकरणाचा आदेश कालबाह्य ठरलेला आहे, असे सांगून पाडुळे म्हणाले की, सन २०११-१२ मध्ये ऐन दुष्काळात उजनी धरणात ३८ टक्के पाणीसाठा असतानादेखील पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता, याचा विचार झाला पाहिजे. वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी त्यांनी केली. (वार्ताहर)