शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

रिंगरोडचा सर्व्हे पुढे सरकेना

By admin | Updated: March 23, 2016 01:36 IST

पुण्यासह जिल्ह्यातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रस्तावित रिंगरोडची अडथळ््यांची शर्यंत अजूनही संपत नाही.

पुणे : पुण्यासह जिल्ह्यातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रस्तावित रिंगरोडची अडथळ््यांची शर्यंत अजूनही संपत नाही. सध्या पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम सुरू असून मावळ, मुळशी व खेड या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काही दिवसांपासून ते काम थांबले आहे. यामुळे सुमारे १८ ते २० किलोमीटरचे सर्वेक्षण रखडले असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शासनाने २००७मध्ये रिंगरोडचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या रिंगरोडच्या मार्गाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करून मार्गाची आखणी करावी व त्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्याचे आदेश गडकरी यांनी दिले आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने प्रस्तावित रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट एका परदेशी कंपनीला देण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात खेड-शिवापूर येथून वडकी नाला, उरुळी कांचन, केसनंदपर्यंत प्रस्तावित रस्त्याची पाहणी करण्यात आली. तर, दुसऱ्या टप्प्यात लोणीकंद ते पुणे-मुंबई महामार्ग या मार्गाची पाहणी झाली होती. या रस्त्यासाठी किती क्षेत्राचे भूसंपादन करावे लागणार आहे, प्रस्तावित मार्गावर काही बांधकामे आहेत का, अतिक्रमण झाले आहे का, आदी माहिती या वेळी घेण्यात आली. त्यानुसार या प्रस्तावित मार्गाचे सर्वेक्षण करून त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पीएमआरडीए आणि एमएसआरडीसीकडून संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या होत्या. संबंधित कंपनीने त्यानुसार पहिल्या टप्प्याच्या शंभर किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम सुरू केले. आतापर्यंत ७५ चौरस किलोमीटर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले; परंतु मावळ, मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्याला विरोध झाल्याने उर्वरित काम थांबले आहे. त्यामुळे किमान १८ ते २० किलोमीटरचे काम रखडले आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षण प्रस्तावित रिंगरोडचे सर्वेक्षण हे ड्रोनद्वारे केले जात आहे. मानवरहित छोट्या विमानातून या मार्गावरील जमिनी, बांधकाम, अतिक्रमणे या सर्व बाबींचा आढावा घेतला जात आहे. सर्वेक्षणासाठी या नव्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे वेळही कमी लागतो व अचूक सर्वेक्षण केले जाते, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिली.