शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एव्हरेस्टवीरांमुळे पुणं होतंय ‘माऊंटेनिंग हब’

By admin | Updated: May 29, 2015 01:03 IST

अंग गोठवणारी थंडी.. बर्फाळ प्रदेश... आॅक्सिजनची कमी.. अशा परिस्थितीत फक्त समोर दिसणारा एव्हरेस्ट सर करायचा, या एकाच ध्येयाने पछाडलेल्या तरुण गिर्यारोहकांची संख्या वाढत आहे.

प्रियांका लोंढे ल्ल पुणेअंग गोठवणारी थंडी.. बर्फाळ प्रदेश... आॅक्सिजनची कमी.. अशा परिस्थितीत फक्त समोर दिसणारा एव्हरेस्ट सर करायचा, या एकाच ध्येयाने पछाडलेल्या तरुण गिर्यारोहकांची संख्या वाढत आहे. आजच्या नव्या पिढीला लाइफमध्ये थ्रिलिंग गोष्टी करायच्या असल्याने तरुणाई गिर्यारोहणाकडे आकर्षित होत आहे. या एव्हरेस्टवीरांमुळे आज पुण्याची ‘माऊंटेनिंग हब’ म्हणून नवी ओळख होताना दिसत आहे.तरुणांमध्ये गिर्यारोहणाची ‘क्रेझ’ वाढत असतानाच, २९ मे हा ‘एव्हरेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो. ही माहिती बऱ्याच जणांना नाही. तेनसिंग नोर्गे आणि सर हिलरी या दोन तरुणांनी २९ मे १९५३ मध्ये एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवले आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या मानवाचा मान त्यांना मिळाला. आणि म्हणूनच २९ मे हा दिवस जगभरात ‘एव्हरेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो.जगभरातून गिर्यारोहक हिमालयात ‘माऊंटेनिंग’साठी येतात. पूर्वी बऱ्याचशा सुविधा नसल्याने गिर्यारोहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. नेपाळ बॉर्डरपासून एव्हरेस्ट पायथ्यापर्यंतचा प्रवास त्यांना पायी करावा लागत असे. परंतु, आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. चांगल्या सुविधा आज गिर्यारोहकांना मिळत आहेत.एव्हरेस्ट चढण्याकडे सर्वसामान्य माणूस एक आव्हान म्हणून पाहतो; परंतु आजच्या मुलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. गिर्यारोहणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतोय, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. मी १९९८मध्ये एव्हरेस्ट सर करून महाराष्ट्रातील पहिल्या एव्हरेस्टवीराचा मान मिळविला. त्या वेळी समजले की, तुम्ही जेव्हा एखादी मोहीम आखता व ती पूर्ण करता, त्या वेळचा आनंद हा वेगळाच असतो.- सुरेंद्र चव्हाण, गिर्यारोहक.एव्हरेस्ट सर करणे शक्यच नाही, असे वैद्यकीय शास्त्रानुसार सांगितले होते; परंतु जिद्दीच्या बळावर माणूस आकाशाला गवसणी घालू शकतो, त्याचप्रमाणे त्याने एव्हरेस्टवर पाऊल ठेवून हिमालयच जिंकला आहे. तरुणांचा वाढता प्रतिसाद पाहता पुण्यातून अनेक नागरिक मोहिमेचे नेतृत्व गिरिप्रेमीतर्फे केले जात आहे. २०१२ मध्ये गिरिप्रेमीच्या ११ जणांनी एव्हरेस्ट चढून विक्रम केला आहे.- उमेश झिरपे, संघटक, गिरिप्रेमी संस्थाएव्हरेस्ट चढणे हा खरंच वेगळा अुभव होता. शेवटच्या टप्प्यात माझं सिलेक्शन झालं. वातावरणातील बदल, आजार या सर्व अडचणींना तोंड देत- १९ मे २०१२ रोजी सकाळी ८.३५ ला एव्हरेस्टवर पोचलो. २० ते २५ मिनिटे शिखरावर थांबून स्वप्न साकार झाल्याचा आनंद घेतला.- प्रसाद जोशी, एव्हरेस्टवीर