शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

आईच्या मायेने न्यायालयही जिंकले...

By admin | Updated: January 7, 2015 00:49 IST

मोठी जाऊ अपत्यहीन... तिच्या पदरात मूल देण्यासाठी लहान सुनेचा लग्नानंतर लगेचच गर्भधारणेसाठी छळ सुरू झाला... यथावकाश तिला मूलही झाले;

हिनाकौसर खान-पिंजार ल्ल पुणेमोठी जाऊ अपत्यहीन... तिच्या पदरात मूल देण्यासाठी लहान सुनेचा लग्नानंतर लगेचच गर्भधारणेसाठी छळ सुरू झाला... यथावकाश तिला मूलही झाले; पण मोठ्या जावेला आई करण्याच्या धांदलीत सासरच्यांनी बाळंतपणाच्या काही तासांतच तिचं जणू काळीजच ओरबाडलं... पहिल्या नाही तर दुसऱ्या बाळाशी तरी आपली नाळ तोडली जाणार नाहीं या आशेने तिने छळ सहन केला. दुसरी मुलगी झाली तर तिलाही हिसकावून किरकोळ निमित्त करून या मातेलाच घराबाहेर काढण्यात आले. आपल्या चिमुरड्यांनी ‘आई’ म्हणत बिलगावं, ही आस घेऊन ती ५ वर्षे न्यायालयात झुरत राहिली अन् अखेर न्यायालयाने तिच्या पदरात दोन्ही अपत्यांचं न्यायदान दिलं. पिंपरी परिसरात राहणारे पूजा व संदीप (नावे बदललेली) यांचे लग्न झाले, त्या वेळी पूजाच्या मोठ्या जावेला अपत्य नव्हते. ती आई होऊ शकणार नव्हती. त्यामुळे पूजाच्या लग्नानंतर लगेचच तिला मुलं व्हावे म्हणून तिला पती व सासऱ्याच्यांची त्रास देण्यास सुरुवात केली. तिला दिवस गेले. तिने मुलाला जन्म दिला आणि बाळंतपणाच्या काही तासांतचं तिचं मुलं मोठ्या जावेला देण्यात आलं. पती व इतर कुटुंबीयांनीही तिच्यावर दबाव आणला, की मूल मोठ्या जावेलाच द्यायचं व त्या बाळाला जवळ घ्यायचं नाही. तिच्या मातृत्वाचा जरासाही विचार न करता ते तिला बाळापासून दूर ठेवू लागले. त्यानंतर पुन्हा तिला दिवस गेले. हे बाळ तरी आपल्याला मिळेल, या आशेवर ती होती. दुसरी मुलगी झाली. सासऱ्यांनी तीही हिसकावून घेतली. एके दिवशी किरकोळ भांडणाचे कारण काढून तिला हाकलून लावले. माहेरची परिस्थिती हलाखीची; त्यामुळे तिला कोणताही आधार मिळेनासा झाला. उपजीविकेसाठी तिने एक इमारातीत साफसफाईचे काम सुरू केले. अखेर चेतना महिला विकास केंद्राच्या सहाय्याने न्यायालयीन लढा देत तिने आपली अपत्य मिळविली. ४ २००९ मध्ये ती कॅम्प येथील चेतना महिला विकास केंद्राकडे आली. त्यांच्या मदतीने तिने मुलांच्या ताबा मिळावा यासाठी त्यांच्यावर खटला दाखल केला. मात्र तेथेही सुरूवातीला संदीप व त्याच्या कुटुंबियांनी दाद दिली नाही.५ वर्ष ती आपल्या मुलांपासून दूर होती आणि एकटीनचे मुलांसाठी हा न्यायालयीन लढा देत होती. ४ अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले आणि न्यायालयाने संदीपला वेगळी खोली घेऊन तिथे पूजा व मुलांना एकत्रित रहावे असा आदेश दिला. तसेच मुले ही दिवसा आईकडे राहतील व आजी आजोबा रात्रीच्या वेळेस त्यांच्याकडे राहू शकतील असेही आदेशात नमूद केले. अशी माहिती चेतना संस्थेच्या प्रमुख अ‍ॅड असुंता पारधे यांनी दिली.