शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

आईच्या मायेने न्यायालयही जिंकले...

By admin | Updated: January 7, 2015 00:49 IST

मोठी जाऊ अपत्यहीन... तिच्या पदरात मूल देण्यासाठी लहान सुनेचा लग्नानंतर लगेचच गर्भधारणेसाठी छळ सुरू झाला... यथावकाश तिला मूलही झाले;

हिनाकौसर खान-पिंजार ल्ल पुणेमोठी जाऊ अपत्यहीन... तिच्या पदरात मूल देण्यासाठी लहान सुनेचा लग्नानंतर लगेचच गर्भधारणेसाठी छळ सुरू झाला... यथावकाश तिला मूलही झाले; पण मोठ्या जावेला आई करण्याच्या धांदलीत सासरच्यांनी बाळंतपणाच्या काही तासांतच तिचं जणू काळीजच ओरबाडलं... पहिल्या नाही तर दुसऱ्या बाळाशी तरी आपली नाळ तोडली जाणार नाहीं या आशेने तिने छळ सहन केला. दुसरी मुलगी झाली तर तिलाही हिसकावून किरकोळ निमित्त करून या मातेलाच घराबाहेर काढण्यात आले. आपल्या चिमुरड्यांनी ‘आई’ म्हणत बिलगावं, ही आस घेऊन ती ५ वर्षे न्यायालयात झुरत राहिली अन् अखेर न्यायालयाने तिच्या पदरात दोन्ही अपत्यांचं न्यायदान दिलं. पिंपरी परिसरात राहणारे पूजा व संदीप (नावे बदललेली) यांचे लग्न झाले, त्या वेळी पूजाच्या मोठ्या जावेला अपत्य नव्हते. ती आई होऊ शकणार नव्हती. त्यामुळे पूजाच्या लग्नानंतर लगेचच तिला मुलं व्हावे म्हणून तिला पती व सासऱ्याच्यांची त्रास देण्यास सुरुवात केली. तिला दिवस गेले. तिने मुलाला जन्म दिला आणि बाळंतपणाच्या काही तासांतचं तिचं मुलं मोठ्या जावेला देण्यात आलं. पती व इतर कुटुंबीयांनीही तिच्यावर दबाव आणला, की मूल मोठ्या जावेलाच द्यायचं व त्या बाळाला जवळ घ्यायचं नाही. तिच्या मातृत्वाचा जरासाही विचार न करता ते तिला बाळापासून दूर ठेवू लागले. त्यानंतर पुन्हा तिला दिवस गेले. हे बाळ तरी आपल्याला मिळेल, या आशेवर ती होती. दुसरी मुलगी झाली. सासऱ्यांनी तीही हिसकावून घेतली. एके दिवशी किरकोळ भांडणाचे कारण काढून तिला हाकलून लावले. माहेरची परिस्थिती हलाखीची; त्यामुळे तिला कोणताही आधार मिळेनासा झाला. उपजीविकेसाठी तिने एक इमारातीत साफसफाईचे काम सुरू केले. अखेर चेतना महिला विकास केंद्राच्या सहाय्याने न्यायालयीन लढा देत तिने आपली अपत्य मिळविली. ४ २००९ मध्ये ती कॅम्प येथील चेतना महिला विकास केंद्राकडे आली. त्यांच्या मदतीने तिने मुलांच्या ताबा मिळावा यासाठी त्यांच्यावर खटला दाखल केला. मात्र तेथेही सुरूवातीला संदीप व त्याच्या कुटुंबियांनी दाद दिली नाही.५ वर्ष ती आपल्या मुलांपासून दूर होती आणि एकटीनचे मुलांसाठी हा न्यायालयीन लढा देत होती. ४ अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले आणि न्यायालयाने संदीपला वेगळी खोली घेऊन तिथे पूजा व मुलांना एकत्रित रहावे असा आदेश दिला. तसेच मुले ही दिवसा आईकडे राहतील व आजी आजोबा रात्रीच्या वेळेस त्यांच्याकडे राहू शकतील असेही आदेशात नमूद केले. अशी माहिती चेतना संस्थेच्या प्रमुख अ‍ॅड असुंता पारधे यांनी दिली.