शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

मायलेकीच्या ‘पुणे-कन्याकुमारी’ प्रवासाने रचला इतिहास; ‘बेटी बचाव’च्या संदेशातून ‘मन की बात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:25 IST

पुणे ते कन्याकुमारी असा ३ हजार ३४४ किलोमीटरचा प्रवास मायलेकींनी अवघ्या आठ दिवसात दुचाकीवरून पूर्ण  करीत एक नवा इतिहास घडविला.

ठळक मुद्देपुणे ते कन्याकुमारी दुचाकी प्रवासात मन्वाने पुरेपूर साथ दिली : मनाली भिडेआई माझी प्रेरणा आहे. पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास मी तिच्यासमवेत एन्जॉय केला : मन्वा भिडे

नम्रता फडणीस

पुणे :  ‘सायकल’ ही तिची खरी पॅशन. सायकल घ्यायची आणि अगदी कुठेही मनसोक्त भटकंती करायची हा तिचा एकमेव ध्यास. परंतु यावेळेला तिने आपल्या आवडीला जरा एक वेगळेच वळण दिले...लांब पल्ल्याचा प्रवास तोही स्वत: च्या मुलीबरोबर एकटीने करण्याचे धाडस आजवर एकाही महिलेने केले नव्हते. तिने मात्र हे शिवधनुष्य लीलया पेलत आपल्या कृतीतून ते सिद्ध केले..पुणे ते कन्याकुमारी असा ३ हजार ३४४ किलोमीटरचा प्रवास मायलेकींनी अवघ्या आठ दिवसात दुचाकीवरून पूर्ण  करीत एक नवा इतिहास घडविला. या प्रवासादरम्यान ‘बेटी वाचवा’ च्या संदेशातून ‘मन की बात’ तिने ग्रामस्थांना सांगितली हे त्यातील विशेष!  सुरूवातीला कुटुंबातील प्रत्येक जण तिला एकटीला प्रवासाला पाठवायला नकार देत होता.कुणाबरोबर जायचे तरी कुणी तिच्याबरोबर येण्यास तयार होत नव्हता. मग तिनेच आपल्या सातवी इयत्तेत शिकणा-या मुलीला हळूच खडा टाकत तू येशील का माझ्याबरोबर? अशी विचारणा केली आणि तिने तत्काळ होकार देताच तिच्या डोळ्यात पाणी तरळले..त्या  ‘हो’ शब्दानेच प्रवासाची एक सकारात्मक उर्जा तिला मिळाली. ही कहाणी आहे मनाली भिडे आणि मन्वा भिडे या मायलेकीची. सगळे बायकर्स महागड्या बाईकने कन्याकुमारीला जातात पण दोघींनी अँक्टिव्हावर हा प्रवास पूर्णत्वास नेला. या प्रवासाचा संपूर्ण अनुभव मनाली भिडे हिने  ‘लोकमत’शी बोलताना कथन केला. मनाली म्हणाली, खर तर मला पुणे ते  कन्याकुमारी सायकल वरून करायचे होते मी गेले कित्येक वर्ष वाट बघत होते पण ग्रुप तयार होत नव्हता, त्यामुळे मी गाडीवरून जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रवासात मन्वाने पुरेपूर साथ दिली. प्रवासामध्ये झाशीच्या राणीसारखे मी तिला ओढणीने घट्ट बांधून घेतले होते. रोज १२ तास ती गाडी वर बसून होती. पण तिने कधीही  कंटाळा केला नाही रोज नव्या उत्साहाने ती तयार होत होती. अवघ्या १२ वर्षाच्या माझ्या चिमुरडीचा हा उत्साह बघून मला पण रोज एनर्जी मिळत होती. या प्रवासाने आई मुलीचे नाते अजून घट्ट झाले. मन्वाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, आज मी जी काही आहे, ते तिच्या पाठिंब्यामुळेच. माझी आई आणि दोन बहिणी यांचापण मोलाचा वाटा आहे. प्रवासात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या राज्यातून फिरलो. निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवत होतो. जमेल तेवढे डोळ्यात आणि कॅमेरामध्ये साठवून घेत होतो. भाषेचा प्रचंड अडथळा येत होता. तरीही संवाद साधत होतो. प्रवासादरम्यान एकदाही मनाला भीती किंवा शंकेचा विचारही शिवला नाही किंवा असुरक्षित वाटले नाही. पण रात्रीचा प्रवास कटाक्षाने टाळला.  मी पूर्णपणे सकारात्मक राहिले, आपला प्रवास चांगलाच होणार आणि आपल्याला चांगलीच लोक भेटणार असे मनाशी पक्के ठरवले होते आणि झाले देखील तसेच, आणि मुख्य म्हणजे माझी मुलगी  माझ्या बरोबर होती. हे जग खूप सुंदर आहे, ते अनुभवायला हवे. बाई असली म्हणून काय झाले? मी विश्वासावर जगते, माणुसकी अनुभवते, प्रवासात विविध भागातील लोकांचे स्वभाव, संस्कृती जाणून घेते, याचाही मला प्रचंड आनंद मिळतो, असे तिने सांगितले.

 

‘हे सुंदर जग अनुभवण्यासाठी मुलींनी घराबाहेर पडावे, अगदी निर्धास्तपणे. मुलींना जगवा आणि मुलींना शिकवा हा संदेश दिला. मजा आली.. एक थरारक राईडचा अनुभव घेता आला.- मनाली भिडे

 

माझी आई माझ्याबरोबर होती, मग मला अजून काय हवे होते. आई माझी प्रेरणा आहे. आजवर मी तिच्याबरोबर सायकलीचा थोडाफार प्रवास केला आहे. पुणे ते कन्याकुमारी हा प्रवासही मी तिच्यासमवेत न कंटाळता खूप एन्जॉय केला.- मन्वा भिडे (मुलगी)

टॅग्स :Puneपुणे