शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

मायलेकीच्या ‘पुणे-कन्याकुमारी’ प्रवासाने रचला इतिहास; ‘बेटी बचाव’च्या संदेशातून ‘मन की बात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:25 IST

पुणे ते कन्याकुमारी असा ३ हजार ३४४ किलोमीटरचा प्रवास मायलेकींनी अवघ्या आठ दिवसात दुचाकीवरून पूर्ण  करीत एक नवा इतिहास घडविला.

ठळक मुद्देपुणे ते कन्याकुमारी दुचाकी प्रवासात मन्वाने पुरेपूर साथ दिली : मनाली भिडेआई माझी प्रेरणा आहे. पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास मी तिच्यासमवेत एन्जॉय केला : मन्वा भिडे

नम्रता फडणीस

पुणे :  ‘सायकल’ ही तिची खरी पॅशन. सायकल घ्यायची आणि अगदी कुठेही मनसोक्त भटकंती करायची हा तिचा एकमेव ध्यास. परंतु यावेळेला तिने आपल्या आवडीला जरा एक वेगळेच वळण दिले...लांब पल्ल्याचा प्रवास तोही स्वत: च्या मुलीबरोबर एकटीने करण्याचे धाडस आजवर एकाही महिलेने केले नव्हते. तिने मात्र हे शिवधनुष्य लीलया पेलत आपल्या कृतीतून ते सिद्ध केले..पुणे ते कन्याकुमारी असा ३ हजार ३४४ किलोमीटरचा प्रवास मायलेकींनी अवघ्या आठ दिवसात दुचाकीवरून पूर्ण  करीत एक नवा इतिहास घडविला. या प्रवासादरम्यान ‘बेटी वाचवा’ च्या संदेशातून ‘मन की बात’ तिने ग्रामस्थांना सांगितली हे त्यातील विशेष!  सुरूवातीला कुटुंबातील प्रत्येक जण तिला एकटीला प्रवासाला पाठवायला नकार देत होता.कुणाबरोबर जायचे तरी कुणी तिच्याबरोबर येण्यास तयार होत नव्हता. मग तिनेच आपल्या सातवी इयत्तेत शिकणा-या मुलीला हळूच खडा टाकत तू येशील का माझ्याबरोबर? अशी विचारणा केली आणि तिने तत्काळ होकार देताच तिच्या डोळ्यात पाणी तरळले..त्या  ‘हो’ शब्दानेच प्रवासाची एक सकारात्मक उर्जा तिला मिळाली. ही कहाणी आहे मनाली भिडे आणि मन्वा भिडे या मायलेकीची. सगळे बायकर्स महागड्या बाईकने कन्याकुमारीला जातात पण दोघींनी अँक्टिव्हावर हा प्रवास पूर्णत्वास नेला. या प्रवासाचा संपूर्ण अनुभव मनाली भिडे हिने  ‘लोकमत’शी बोलताना कथन केला. मनाली म्हणाली, खर तर मला पुणे ते  कन्याकुमारी सायकल वरून करायचे होते मी गेले कित्येक वर्ष वाट बघत होते पण ग्रुप तयार होत नव्हता, त्यामुळे मी गाडीवरून जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रवासात मन्वाने पुरेपूर साथ दिली. प्रवासामध्ये झाशीच्या राणीसारखे मी तिला ओढणीने घट्ट बांधून घेतले होते. रोज १२ तास ती गाडी वर बसून होती. पण तिने कधीही  कंटाळा केला नाही रोज नव्या उत्साहाने ती तयार होत होती. अवघ्या १२ वर्षाच्या माझ्या चिमुरडीचा हा उत्साह बघून मला पण रोज एनर्जी मिळत होती. या प्रवासाने आई मुलीचे नाते अजून घट्ट झाले. मन्वाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, आज मी जी काही आहे, ते तिच्या पाठिंब्यामुळेच. माझी आई आणि दोन बहिणी यांचापण मोलाचा वाटा आहे. प्रवासात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या राज्यातून फिरलो. निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवत होतो. जमेल तेवढे डोळ्यात आणि कॅमेरामध्ये साठवून घेत होतो. भाषेचा प्रचंड अडथळा येत होता. तरीही संवाद साधत होतो. प्रवासादरम्यान एकदाही मनाला भीती किंवा शंकेचा विचारही शिवला नाही किंवा असुरक्षित वाटले नाही. पण रात्रीचा प्रवास कटाक्षाने टाळला.  मी पूर्णपणे सकारात्मक राहिले, आपला प्रवास चांगलाच होणार आणि आपल्याला चांगलीच लोक भेटणार असे मनाशी पक्के ठरवले होते आणि झाले देखील तसेच, आणि मुख्य म्हणजे माझी मुलगी  माझ्या बरोबर होती. हे जग खूप सुंदर आहे, ते अनुभवायला हवे. बाई असली म्हणून काय झाले? मी विश्वासावर जगते, माणुसकी अनुभवते, प्रवासात विविध भागातील लोकांचे स्वभाव, संस्कृती जाणून घेते, याचाही मला प्रचंड आनंद मिळतो, असे तिने सांगितले.

 

‘हे सुंदर जग अनुभवण्यासाठी मुलींनी घराबाहेर पडावे, अगदी निर्धास्तपणे. मुलींना जगवा आणि मुलींना शिकवा हा संदेश दिला. मजा आली.. एक थरारक राईडचा अनुभव घेता आला.- मनाली भिडे

 

माझी आई माझ्याबरोबर होती, मग मला अजून काय हवे होते. आई माझी प्रेरणा आहे. आजवर मी तिच्याबरोबर सायकलीचा थोडाफार प्रवास केला आहे. पुणे ते कन्याकुमारी हा प्रवासही मी तिच्यासमवेत न कंटाळता खूप एन्जॉय केला.- मन्वा भिडे (मुलगी)

टॅग्स :Puneपुणे