शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:10 IST

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही वाढू लागल्याने ...

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही वाढू लागल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. त्यामुळे नगरपरिषदेने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

राजगुरुनगर शहरातील सांडपाणी भीमा नदीत सोडले जाते. तसेच ओढ्यानाल्यांना सोडलेले पाणी नदीत येऊन मिसळत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून सिद्धेश्वर बंधाऱ्यातल्या नदीच्या पाण्यात जलपर्णी वाढते. तसेच गेली काही वर्षे पााण्यावर शेवाळ्यासारख्या पाणवनस्पतीचा तवंगही येत आहे. मात्र पाणी वाहते राहत असल्याने केदारेश्वर बंधाऱ्यात या दोन्ही वनस्पती राहत नाही मात्र. सध्या केदारेश्वर बंधाऱ्यात पाण्याखाली 'हायाड्रिला' नावाची पाणवनस्पतीचा थर साचला आहे. केदारेश्वर बंधाऱ्यातही थोड्या प्रमाणात सांडपाणी येत असल्याने पाणी खराब झाले असून नदीला येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे बंधाऱ्यात शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी योग्य राहले नाही.

नगर परिषेदेची सध्याची पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा सक्षम नसल्याने लोकांना अर्धवटच स्वच्छ होणारे हे खराब पाणी वापरावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नागरिकांनी पिण्यासाठी हे पाणी वापरण्याचे जवळपास बंद केले आहे. त्यामुळे राजगुरुनगरला मिनरल वॉटरच्या प्लास्टिक जारची जोरदार विक्री सुरू आहे. गरीब नागरिकांना हे पाण्याचे जार परवडत नसल्यामुळे ते आसपासच्या विहिरीतून पाणी आणून गरज भागवत आहे. त्यामुळे भरपूर पाणी असतानाही, अव्यवस्थेमुळे लोकांचे हाल होऊन खर्चही वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जेव्हा नदीत पाण्याचा प्रवाह सुरु असतो तेव्हा पाणी बऱ्यापैकी शुध्द असते. नदीची धार व प्रवाह बंद झाली की बंधाऱ्याचे डबके होऊन पाणी खराब होते.

१७ राजगुरुनगर

राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ तयार होऊन पाणी खराब झाले आहे.