शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
3
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
4
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
5
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
6
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
7
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
8
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
10
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
11
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
12
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
13
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
14
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
17
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
18
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 

केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:10 IST

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही वाढू लागल्याने ...

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही वाढू लागल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. त्यामुळे नगरपरिषदेने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

राजगुरुनगर शहरातील सांडपाणी भीमा नदीत सोडले जाते. तसेच ओढ्यानाल्यांना सोडलेले पाणी नदीत येऊन मिसळत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून सिद्धेश्वर बंधाऱ्यातल्या नदीच्या पाण्यात जलपर्णी वाढते. तसेच गेली काही वर्षे पााण्यावर शेवाळ्यासारख्या पाणवनस्पतीचा तवंगही येत आहे. मात्र पाणी वाहते राहत असल्याने केदारेश्वर बंधाऱ्यात या दोन्ही वनस्पती राहत नाही मात्र. सध्या केदारेश्वर बंधाऱ्यात पाण्याखाली 'हायाड्रिला' नावाची पाणवनस्पतीचा थर साचला आहे. केदारेश्वर बंधाऱ्यातही थोड्या प्रमाणात सांडपाणी येत असल्याने पाणी खराब झाले असून नदीला येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे बंधाऱ्यात शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी योग्य राहले नाही.

नगर परिषेदेची सध्याची पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा सक्षम नसल्याने लोकांना अर्धवटच स्वच्छ होणारे हे खराब पाणी वापरावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नागरिकांनी पिण्यासाठी हे पाणी वापरण्याचे जवळपास बंद केले आहे. त्यामुळे राजगुरुनगरला मिनरल वॉटरच्या प्लास्टिक जारची जोरदार विक्री सुरू आहे. गरीब नागरिकांना हे पाण्याचे जार परवडत नसल्यामुळे ते आसपासच्या विहिरीतून पाणी आणून गरज भागवत आहे. त्यामुळे भरपूर पाणी असतानाही, अव्यवस्थेमुळे लोकांचे हाल होऊन खर्चही वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जेव्हा नदीत पाण्याचा प्रवाह सुरु असतो तेव्हा पाणी बऱ्यापैकी शुध्द असते. नदीची धार व प्रवाह बंद झाली की बंधाऱ्याचे डबके होऊन पाणी खराब होते.

१७ राजगुरुनगर

राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ तयार होऊन पाणी खराब झाले आहे.