शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

इंदापूरची हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच, शौचालयाचा वापर नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:05 IST

ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली

अकोले : ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली. यामुळे गावोगावी शौचालयांची संख्या वाढली आहे. मात्र, याचा वापर नगण्य होत असल्याने प्रत्यक्षात ग्रामीण भागातील हगणदारीमुक्तीचे चित्र केवळ कागदावरच राहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील गावोगावी उघड्यावरील हगणदारी वाढत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे रूप पालटले नसल्याचे पाहायला मिळत आहे.केंद्र शासनाने २००५ पासून पुन्हा निर्मल ग्राम योजना सुरु करून यामध्ये शौचालय बांधणाºया प्रत्येक कुटुंबाला पाचशे रुपये अनुदान देण्यात येत होते. महत्त्वाचे म्हणजे २००८ पासून निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती वाढली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहित करण्यात आले. या अभियानांतर्गत काही ग्रामपंचायतींना पुरस्कारदेखील मिळाला. तेव्हापासून ग्रामीण भागातील हगणदारीचे चित्र पालटायला सुरुवात झाली. सन २००९ पासून शौचालयासाठी मिळणाºया अनुदानात वाढ होऊन लाभार्थ्याला अनुदान देण्यात येत होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात गावे हगणदारीमुक्त होण्यास विलंब होऊ लागल्याने सन २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्याने शौचालयासाठी बारा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. अनुदानात वाढ झाल्याने ग्रामीण भागात शौचालयांची संख्या वाढली मात्र, त्या प्रमाणात वापर होत नाही.