शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याचे संरक्षक कठडे तुटलेले

By admin | Updated: May 7, 2017 02:23 IST

लाटे (ता. बारामती) येथील नरीा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दहा वर्षांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : लाटे (ता. बारामती) येथील नरीा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दहा वर्षांपासून या बंधाऱ्याला संरक्षक कठडेच नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. या ठिकाणावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. लवकरात लवकर या ठिकाणी संरक्षक कठडे बसवावे, अशी मागणी बारामती तालुक्यातील लाटे, थापेटेवाडी, कोऱ्हाळे, बजरंगवाडी, माळशिकारेवाडी, कुरणेवाडी, माळवाडी, तसेच फलटण तालुकयातील खुंटे, शिंदेवाडी, धुमाळवाडी, जिंती येथील ग्रामस्थांनी केली आहे. दर वर्षी येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नीरा नदीवरील सर्वच बंधारे कमकुवत झाले आहेत. तर ढापे गंजले असून बंधाऱ्यामधून लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. वारंवार दुरुस्ती करूनही हे बंधारे वारंवार उखडत आहेत. लाटे या ठिकाणी बांधण्यात आलेला बंधारा हा सोळा वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. तेव्हा त्या बंधाऱ्याला संरक्षण कठडे उभारण्यात आले होते. मात्र त्यानंतर आलेल्या मोठया पुराने ते वाहून गेले होते. आज याला सात ते आठ वर्ष झाली तरीही बंधाऱ्याला संरक्षक कठडे उभारण्याची तसदी पाटबंधारे खात्याने घेतली नाही. त्यामुळे हा बंधारा वाहतूकीसाठी धाकादायक बनला आहे. या बंधाऱ्याला संरक्षक कठडेच नसल्याने याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. वारंवार मागणी करूनही या ठिकाणी संरक्षक कठडे बसविले जाते नाही. संरक्षक कठडयाअभावी होत असलेला अपघाताचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे, असे थोपटेवाडीचे ग्रामस्थ प्रमोद पानसरे यांनी सांगितले. बंधाऱ्याचे किनार खचलेबंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे किनारे वाळूू आणि व मातीच्या उपशामुळे खचले आहेत. संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन ताबडतोब याची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बंधाऱ्याच्या पलीकडे म्हणजे सातारा हद्दीत शिंदेवाडी याठिकाणी केबी कंपनी तसेच सुरवडी या ठिकाणी कमीन्स कंपनी असल्याने बारामती तालुकयातील सुमारे दहा ते पंधरा गावांतील हतारच्या आसपास महीला व पुरूष नोकरी निमित्त या बंधाऱ्यावरून ये जा करत असतात, तसेच पुणे आणि सातारा या दोन जिल्हयांना जोडणारा हा बंधारा असल्याने निरा नदीकाठाच्या नागरीकांना देवाण घेवाण साठी हा बंधारा अत्यंत उपयोगी आहे.