शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला आणखी पाणी

By admin | Updated: April 24, 2016 04:23 IST

एक दिवसाआड (तीस टक्के) होत असलेल्या पाणीकपातीमुळे मेटाकुटीला आलेल्या पुणेकरांवर आणखी पाणीकपातीची टांगती तलवार आहे. शनिवारी झालेल्या कालवा समितीच्या

पुणे : एक दिवसाआड (तीस टक्के) होत असलेल्या पाणीकपातीमुळे मेटाकुटीला आलेल्या पुणेकरांवर आणखी पाणीकपातीची टांगती तलवार आहे. शनिवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत दौंड, इंदापूर तालुक्याच्या आमदारांनी खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या धरणातील शिल्लक पाणीसाठा पाहता पुणे शहराला सोडून इतर कोठेही पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या इतर भागात पाणी द्यायचे असल्सास पुण्याच्या पाण्यामध्ये कपात करावी लागेल. याबाबत पालकमंत्री येत्या गुरुवारी (दि. २८) निर्णय घेणार आहेत. त्याअगोदर बुधवारी (दि. २७) पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या कालव्यातून होणाऱ्या गळतीची पाहणी पालकमंत्री करणार आहेत. पुणे विधानभवनात बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समिती बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस महापौर प्रशांत जगताप, आमदार राहुल कुल, बाबूराव पाचर्णे, दत्तात्रय भरणे, सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे अधिकारी अतुल कपोले यांनी खडकवासला धरण साखळीमध्ये ५.६५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुढील तीन महिन्यात यातील सुमारे १.३५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. तर पुणे शहराला या धरणांमधून ३.९० टीएमसी पाणी देणार आहे. त्यामुळे धरणांमध्ये केवळ ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. दौंड शहर व जिल्ह्याला ०.५० टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे, अशी माहिती दिली. या वेळी राहुल कुल यांनी दौंडमधील पिण्याचे पाणी संपले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी केली. पुण्याचे पाणी कोणालाच देणार नाही : महापौर सध्या खडकवासला धरण साखळीमध्ये असलेले पाणी हे पुणे शहराचे हक्काचे पाणी आहे. ग्रामीण भागासाठी जे दीड टीएमसी पाणी मागितले जात आहे ते व्यवहार्य नाही. तसे जर केले तर पुणेकरांना मे महिन्यानंतर पाणीपुरवठा करणे शक्यच होणार नाही. जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे नियम सांगितले त्याचेच आम्ही पालन केले आहे. दौंड व इंदापूरसाठी जे पाणी सोडण्याचा आग्रह केला जात आहे ते पाणी बाष्पीभवन, कालव्यांच्या नादुरुस्ती, मध्येच मोटारपंपाने पाणी उचलणे या साऱ्या बाबींचा विचार करता पोहोचू शकत नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी, हे स्पष्ट होत नाही. सध्या खडकवासला धरणात जे पाणी आहे ते केवळ पुणे शहरालाच लागणार आहे, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. कालव्याची पाहणी : बापट पुणे शहरासाठी खडकवासला धरणातून कालव्यातून जो पाणीपुरवठा होतो, त्या कालव्यातून अनेक ठिकाणी पाणीगळती होत आहे. १ फेब्रुवारीला झालेल्या कालवा समितीच्या बैैठकीत पालिकेला ही गळती रोखण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मी स्वत: जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी या गळतीची प्रत्यक्ष पाहणी बुधवारी करणार असल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली. ही पाहणी करून गळती रोखण्यासाठी काय उपययोजना करता येतील याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने सर्वांचा विचार करावा. तुम्ही मोठे भाऊ आहात. आम्ही लहान भाऊ आहोत. इंदापूरला एक टीएमसी पाणी द्यावे. महापौरसाहेब तुम्हाला पुण्य लागेल. आमच्या मुला-बाळांचे आशीर्वाद लागतील. त्यामुळे आम्हाला पाणी देण्याची भूमिका घ्या. - दत्तात्रय भरणे, आमदार, इंदापूर आमच्या हक्काचे पाणी मागत आहोत. आमच्या जमिनी या धरणांसाठी आम्ही दिलेल्या आहेत. शेतीसाठी पाणी मागत नाही. केवळ पिण्यासाठी पाणी हवे आहे. ते जर मिळणार नसेल तर ते चुकीचे आहे. महानगरपालिका जर नियमाप्रमाणे पाणीवाटप करा म्हणत असेल तर पालिकेलाही पाणी देताना हाच न्याय लावावा. दौडला पिण्यासाठी अर्धा पाणी टीएमसी सोडावेच लागेल. - राहुल कुल, आमदार, दौंड पाणी सर्वांना हवे आहे. पुणेकरांनी हा विचार करावा, की ग्रामीण भागालाही पाण्याची आवश्यकता असते. जिल्हा परिषद व जीवन प्राधिकरणच्या पाणी योजनांना पाणीपुरवठा व्हायलाच हवा. त्याचे नियोजन व्हायला हवे, अन्यथा ग्रामीण भागात आणखी पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. - प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद