शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

जिल्ह्याला आणखी पाणी

By admin | Updated: April 24, 2016 04:23 IST

एक दिवसाआड (तीस टक्के) होत असलेल्या पाणीकपातीमुळे मेटाकुटीला आलेल्या पुणेकरांवर आणखी पाणीकपातीची टांगती तलवार आहे. शनिवारी झालेल्या कालवा समितीच्या

पुणे : एक दिवसाआड (तीस टक्के) होत असलेल्या पाणीकपातीमुळे मेटाकुटीला आलेल्या पुणेकरांवर आणखी पाणीकपातीची टांगती तलवार आहे. शनिवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत दौंड, इंदापूर तालुक्याच्या आमदारांनी खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या धरणातील शिल्लक पाणीसाठा पाहता पुणे शहराला सोडून इतर कोठेही पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या इतर भागात पाणी द्यायचे असल्सास पुण्याच्या पाण्यामध्ये कपात करावी लागेल. याबाबत पालकमंत्री येत्या गुरुवारी (दि. २८) निर्णय घेणार आहेत. त्याअगोदर बुधवारी (दि. २७) पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या कालव्यातून होणाऱ्या गळतीची पाहणी पालकमंत्री करणार आहेत. पुणे विधानभवनात बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समिती बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस महापौर प्रशांत जगताप, आमदार राहुल कुल, बाबूराव पाचर्णे, दत्तात्रय भरणे, सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे अधिकारी अतुल कपोले यांनी खडकवासला धरण साखळीमध्ये ५.६५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुढील तीन महिन्यात यातील सुमारे १.३५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. तर पुणे शहराला या धरणांमधून ३.९० टीएमसी पाणी देणार आहे. त्यामुळे धरणांमध्ये केवळ ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. दौंड शहर व जिल्ह्याला ०.५० टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे, अशी माहिती दिली. या वेळी राहुल कुल यांनी दौंडमधील पिण्याचे पाणी संपले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी केली. पुण्याचे पाणी कोणालाच देणार नाही : महापौर सध्या खडकवासला धरण साखळीमध्ये असलेले पाणी हे पुणे शहराचे हक्काचे पाणी आहे. ग्रामीण भागासाठी जे दीड टीएमसी पाणी मागितले जात आहे ते व्यवहार्य नाही. तसे जर केले तर पुणेकरांना मे महिन्यानंतर पाणीपुरवठा करणे शक्यच होणार नाही. जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे नियम सांगितले त्याचेच आम्ही पालन केले आहे. दौंड व इंदापूरसाठी जे पाणी सोडण्याचा आग्रह केला जात आहे ते पाणी बाष्पीभवन, कालव्यांच्या नादुरुस्ती, मध्येच मोटारपंपाने पाणी उचलणे या साऱ्या बाबींचा विचार करता पोहोचू शकत नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी, हे स्पष्ट होत नाही. सध्या खडकवासला धरणात जे पाणी आहे ते केवळ पुणे शहरालाच लागणार आहे, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. कालव्याची पाहणी : बापट पुणे शहरासाठी खडकवासला धरणातून कालव्यातून जो पाणीपुरवठा होतो, त्या कालव्यातून अनेक ठिकाणी पाणीगळती होत आहे. १ फेब्रुवारीला झालेल्या कालवा समितीच्या बैैठकीत पालिकेला ही गळती रोखण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मी स्वत: जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी या गळतीची प्रत्यक्ष पाहणी बुधवारी करणार असल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली. ही पाहणी करून गळती रोखण्यासाठी काय उपययोजना करता येतील याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने सर्वांचा विचार करावा. तुम्ही मोठे भाऊ आहात. आम्ही लहान भाऊ आहोत. इंदापूरला एक टीएमसी पाणी द्यावे. महापौरसाहेब तुम्हाला पुण्य लागेल. आमच्या मुला-बाळांचे आशीर्वाद लागतील. त्यामुळे आम्हाला पाणी देण्याची भूमिका घ्या. - दत्तात्रय भरणे, आमदार, इंदापूर आमच्या हक्काचे पाणी मागत आहोत. आमच्या जमिनी या धरणांसाठी आम्ही दिलेल्या आहेत. शेतीसाठी पाणी मागत नाही. केवळ पिण्यासाठी पाणी हवे आहे. ते जर मिळणार नसेल तर ते चुकीचे आहे. महानगरपालिका जर नियमाप्रमाणे पाणीवाटप करा म्हणत असेल तर पालिकेलाही पाणी देताना हाच न्याय लावावा. दौडला पिण्यासाठी अर्धा पाणी टीएमसी सोडावेच लागेल. - राहुल कुल, आमदार, दौंड पाणी सर्वांना हवे आहे. पुणेकरांनी हा विचार करावा, की ग्रामीण भागालाही पाण्याची आवश्यकता असते. जिल्हा परिषद व जीवन प्राधिकरणच्या पाणी योजनांना पाणीपुरवठा व्हायलाच हवा. त्याचे नियोजन व्हायला हवे, अन्यथा ग्रामीण भागात आणखी पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. - प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद