शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

जेवढे अधिकृत तेवढेच अनधिकृत ‘जोड’

By admin | Updated: August 23, 2015 04:42 IST

शहरातील प्रत्येकाला पाणी पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी महापालिकेकडून ठरावीक शुल्क आकारून मागणी करणाऱ्या प्रत्येकाला नळजोड दिले जातात.

-  सुनील राऊत,  पुणेशहरातील प्रत्येकाला पाणी पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी महापालिकेकडून ठरावीक शुल्क आकारून मागणी करणाऱ्या प्रत्येकाला नळजोड दिले जातात. मात्र, महापालिकेने शहरात जेवढे अधिकृत नळजोड दिले आहेत त्याच्यापेक्षा दीड पट अनधिकृत नळजोड शहरात आहेत. विशेष म्हणजे, या अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधीही आघाडीवर असून, अनेकांच्या घरात डझनभर नळजोड असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे. या नळजोडांचा वापर हॉटेल, मंगल कार्यालये, बांधकामे, पाण्याचे टँकर भरून देणे यासह अनेक कामांसाठी केला जात असल्याने दरवर्षी जवळपास लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने प्रामाणिकपणे नळजोड घेणाऱ्यांचा घसा मात्र कोरडाच राहात आहे.१ लाख ९६ हजार अनधिकृत नळजोड महापालिका प्रशासनाकडून शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २६00 किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले आहे. या जलवाहिन्यांवरून महापालिकेने अधिकृतपणे शहरातील मिळकती तसेच सोसायट्यांना १ लाख ६0 हजार नळजोड दिलेले आहेत. तर प्रशासनाकडे असलेल्या माहितीनुसार, शहरात तब्बल १ लाख ९६ हजार अनधिकृत नळजोड आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतांश नळजोड हे व्यावसायिक कारणास्तव वापरले जातात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतोय. या पेक्षाही गंभीर बाब म्हणजे या नळजोड धारकांकडून एक रुपयाचीही पाणीपट्टी महापालिका प्रशासनास भरली जात नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेला सुमारे ६0 ते ७0 कोटींचा भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.आम्ही घेतले तुम्हीही घ्या... हे घेण्यात आलेले बहुतांश अनधिकृत नळजोड स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कृपेने घेण्यात येतात. शहरात प्रामुख्याने झोपडपट्ट्यांच्या परिसरामध्ये हे नळजोड घेण्यात आलेले आहेत. मात्र, यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींकडून हे अनधिकृत नळजोड दिले जातात, त्यांच्या घरांमध्येच पाच ते दहा नळजोड असल्याचेही दिसून आले आहे. विशेष बाब म्हणजे शहरातून जाणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवरून हे नळजोड घेतले गेले असल्याने त्यांच्या घरांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा सुरू राहतो. अशाच प्रकारची एक मुख्य जलवाहिनी पर्वती ते वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत आहे. ही जलवाहिनी उतारावर असल्याने संपूर्ण वर्षभर त्यात पाणी असते. त्यामुळे या जलवाहिनीवरून या लोकप्रतिनिधींनी पाच ते दहा किलोमीटर लांब पर्यंत जलवाहिन्या टाकून हे नळजोड घेतलेले आहेत.वॉटर मीटरशिवाय पर्याय नाही... शहरातील ही पाणीचोरी रोखायची असल्यास महापालिकेस प्रत्येक मिळकतीत सुरू असलेल्या नळाला वॉटर मीटर बसविण्याशिवाय पर्याय नाही. महापालिकेकडून अनेकदा या अनधिकृत नळजोडांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. मात्र, सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली जात नाही. तर नळजोडाची माहिती मिळाल्यानंतर कारवाईस गेलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. त्यामुळे महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या समान पाणी मीटर वाटप योजनेत प्रत्येक नळजोडास वॉटर मीटर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल ९00 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सुमारे साडेतीन लाख वॉटर मीटर पालिकेकडून प्रस्तावित करण्यात आले आहेत. ५० हजार मोटारी ओढाताहेत पाणी शहरात बेकायदेशीरपणे घेतलेल्या या अनधिकृत नळजोडांना पाणी पुरेशा दाबाने येत नाही म्हणून तब्बल ५0 हजार पाणी खेचणाऱ्या मोटारी शहरात ठिकठिकाणी असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारीच खासगीत बोलताना देतात. एखाद्या परिसरात अशा मोटारी लावल्या गेल्यास त्या परिसरातील इतर नागरिकांना थेंबभर पाणी मिळण्याची बोंबही होते. पालिकेकडून वर्षभर अशा मोटारींवर कारवाई केली जाते. मात्र, त्यात सातत्य नसल्याने तसेच केवळ तक्रार आली तरच कारवाई केली जात असल्याचेही दिसून येते.