शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

जेवढे अधिकृत तेवढेच अनधिकृत ‘जोड’

By admin | Updated: August 23, 2015 04:42 IST

शहरातील प्रत्येकाला पाणी पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी महापालिकेकडून ठरावीक शुल्क आकारून मागणी करणाऱ्या प्रत्येकाला नळजोड दिले जातात.

-  सुनील राऊत,  पुणेशहरातील प्रत्येकाला पाणी पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी महापालिकेकडून ठरावीक शुल्क आकारून मागणी करणाऱ्या प्रत्येकाला नळजोड दिले जातात. मात्र, महापालिकेने शहरात जेवढे अधिकृत नळजोड दिले आहेत त्याच्यापेक्षा दीड पट अनधिकृत नळजोड शहरात आहेत. विशेष म्हणजे, या अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधीही आघाडीवर असून, अनेकांच्या घरात डझनभर नळजोड असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे. या नळजोडांचा वापर हॉटेल, मंगल कार्यालये, बांधकामे, पाण्याचे टँकर भरून देणे यासह अनेक कामांसाठी केला जात असल्याने दरवर्षी जवळपास लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने प्रामाणिकपणे नळजोड घेणाऱ्यांचा घसा मात्र कोरडाच राहात आहे.१ लाख ९६ हजार अनधिकृत नळजोड महापालिका प्रशासनाकडून शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २६00 किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले आहे. या जलवाहिन्यांवरून महापालिकेने अधिकृतपणे शहरातील मिळकती तसेच सोसायट्यांना १ लाख ६0 हजार नळजोड दिलेले आहेत. तर प्रशासनाकडे असलेल्या माहितीनुसार, शहरात तब्बल १ लाख ९६ हजार अनधिकृत नळजोड आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतांश नळजोड हे व्यावसायिक कारणास्तव वापरले जातात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतोय. या पेक्षाही गंभीर बाब म्हणजे या नळजोड धारकांकडून एक रुपयाचीही पाणीपट्टी महापालिका प्रशासनास भरली जात नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेला सुमारे ६0 ते ७0 कोटींचा भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.आम्ही घेतले तुम्हीही घ्या... हे घेण्यात आलेले बहुतांश अनधिकृत नळजोड स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कृपेने घेण्यात येतात. शहरात प्रामुख्याने झोपडपट्ट्यांच्या परिसरामध्ये हे नळजोड घेण्यात आलेले आहेत. मात्र, यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींकडून हे अनधिकृत नळजोड दिले जातात, त्यांच्या घरांमध्येच पाच ते दहा नळजोड असल्याचेही दिसून आले आहे. विशेष बाब म्हणजे शहरातून जाणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवरून हे नळजोड घेतले गेले असल्याने त्यांच्या घरांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा सुरू राहतो. अशाच प्रकारची एक मुख्य जलवाहिनी पर्वती ते वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत आहे. ही जलवाहिनी उतारावर असल्याने संपूर्ण वर्षभर त्यात पाणी असते. त्यामुळे या जलवाहिनीवरून या लोकप्रतिनिधींनी पाच ते दहा किलोमीटर लांब पर्यंत जलवाहिन्या टाकून हे नळजोड घेतलेले आहेत.वॉटर मीटरशिवाय पर्याय नाही... शहरातील ही पाणीचोरी रोखायची असल्यास महापालिकेस प्रत्येक मिळकतीत सुरू असलेल्या नळाला वॉटर मीटर बसविण्याशिवाय पर्याय नाही. महापालिकेकडून अनेकदा या अनधिकृत नळजोडांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. मात्र, सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली जात नाही. तर नळजोडाची माहिती मिळाल्यानंतर कारवाईस गेलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. त्यामुळे महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या समान पाणी मीटर वाटप योजनेत प्रत्येक नळजोडास वॉटर मीटर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल ९00 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सुमारे साडेतीन लाख वॉटर मीटर पालिकेकडून प्रस्तावित करण्यात आले आहेत. ५० हजार मोटारी ओढाताहेत पाणी शहरात बेकायदेशीरपणे घेतलेल्या या अनधिकृत नळजोडांना पाणी पुरेशा दाबाने येत नाही म्हणून तब्बल ५0 हजार पाणी खेचणाऱ्या मोटारी शहरात ठिकठिकाणी असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारीच खासगीत बोलताना देतात. एखाद्या परिसरात अशा मोटारी लावल्या गेल्यास त्या परिसरातील इतर नागरिकांना थेंबभर पाणी मिळण्याची बोंबही होते. पालिकेकडून वर्षभर अशा मोटारींवर कारवाई केली जाते. मात्र, त्यात सातत्य नसल्याने तसेच केवळ तक्रार आली तरच कारवाई केली जात असल्याचेही दिसून येते.