शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

समितीला जादा वर्गांची घाई

By admin | Updated: July 27, 2016 03:57 IST

केंद्रीय प्रवेश समितीने सहा महाविद्यालयांमध्ये जादा वर्गचा निर्णय घेतला असला, तरी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्यच या निर्णयाबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

पुणे : केंद्रीय प्रवेश समितीने सहा महाविद्यालयांमध्ये जादा वर्गचा निर्णय घेतला असला, तरी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्यच या निर्णयाबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. सहा महाविद्यालयांपैकी एका महाविद्यालयातील प्राचार्यांशी याबाबत संपर्क साधला असता, समितीकडून अद्याप विचारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जागा वर्गांबाबत घाई करणारी समिती किती गंभीर आहे, हेच स्पष्ट होते.अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सहा महाविद्यालयांमध्ये जादा वर्ग घेतले जाणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, हा निर्णय घेताना संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा व्यवस्थापनाशी चर्चाच केलेली नाही. विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी संबंधित सहा महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. रात्री उशिरापर्यंंत या निर्णयाबाबतची माहिती संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांपर्यंत पोहचली नाही. समितीने बुधवारपासूनच जादा वर्ग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाविद्यालयांना माहितीच नसल्याने हे वर्ग बुधवारपासून सुरू होण्याची शक्यता कमी आहे.(प्रतिनिधी)समितीच्या निर्णयाविषयी सहा महाविद्यालयांपैकी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विचारले असता ते म्हणाले, रात्री उशिरापर्यंत समितीकडून याबाबतची काहीही माहिती देण्यात आलेली नाही. विद्यार्थिहितासाठी महाविद्यालय जादा वर्ग घेण्यासाठी तयार आहे. मात्र, त्याबाबत पुरेसे नियोजन करणे आवश्यक आहे. बुधवारपासून लगेचच वर्ग सुरू करणे अशक्य आहे. समितीने व्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय घेणे अपेक्षित होते. त्यातून विविध पर्यायांवर विचार झाला असता. हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. एका महाविद्यालयात किती विद्यार्थी येणार, हेही निश्चित नाही.