शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

वीजजोड तोडणीला दिलेली स्थगिती पुन्हा उठवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:12 IST

उरुळी कांचन : राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विजजोड तोडणीला दिलेली स्थगिती अधिवेशन संपण्याच्या दिवशी उठवल्याने वीज ग्राहकांमध्ये ...

उरुळी कांचन : राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विजजोड तोडणीला दिलेली स्थगिती अधिवेशन संपण्याच्या दिवशी उठवल्याने वीज ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्य सरकारच्या या फसवणुकीमुळे टीकेची झोड उठत आहे. वीज बिलावर आकारलेले व्याज व दंड व्याज माफ करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

मागीलवर्षी लॉकडाउनच्या काळातील वीज बिल माफ करून नंतरचे बिल भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी ग्राहक करीत आहेत. मात्र, वीज वितरण कंपनीकडून विज जोड तोडणीचा धडाका सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात जनता मेटाकुटीला आली आहे.

थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडणी करण्याची घोषणा करताच शुक्रवारी (ता. १२ ) हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, कोरेगाव मूळ, अष्टापुर, व उरुळी कांचन परिसरातील ८० जणांचा वीज पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे यांनी दिली. यामुळे पूर्व हवेलीतील नागरिकांना अंधारात चाचपडत जगण्याची वेळ आली आहे.

मागीलवर्षी लॉकडाउनच्या काळापासून वीजबिले थकीत आहेत, यानंतर काही प्रमाणात वीज बिल भरण्याची मानसिकता नागरिकांची होती. मात्र, सर्वच राजकीय पक्षांच्या जेष्ठ ते कनिष्ठ पुढाऱ्यांनी विधानसभा निवडणुका दरम्यान विजबिल माफ होणार, आपल्या पक्षाची सत्ता आली की वीज बिल माफ होणारच, बील भरू नका असे प्रबोधन करीत मतदारांकडून मते पदरात पाडून घेतली व त्यानंतर त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला. यामुळे अनेक जण या फसवणुकीला बळी पडले व विजबिल भरणा केला नाही. त्यामुळे त्यांना मागील वर्षापासूनचे विजबील भरावे लागणार आहेच. शिवाय त्या वर व्याज... दंडव्याज असा भरमसाठ भरणाही करावा लागणार असल्याने ग्राहकांच्या नाकीनऊ आले आहेत.

चौकट

राज्य शासनाने घरगुती, व्यावसायिक, व औद्योगिक क्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिल्यानंतर उरुळी कांचन येथे उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे कर्मचाऱ्यांसह थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी फील्डवर उतरल्याने उरुळी कांचन उपविभाग क्षेत्रात काल पासून वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. उरुळी कांचन येथील अनेक ग्राहकांचे वीज जोड तोडणी महावितरण कडून करण्यात आली. दरम्यान, ही धडक कारवाई उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, सहाय्यक अभियंता संजय पोफळे, गजानन मोरे, नयीम सुतार व अन्य कर्मचारी यांनी केली आहे.

कोट

वीज ग्राहकांनी थकीत बिले तातडीने भरणा करावी, त्यासाठी त्यांना एकदम भरता येणे शक्य नसल्यास हप्ते करून देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुढे थकबाकीदारांना कोणतीही पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी वीजबिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे.- प्रदिप सुरवसे, उपकार्यकारी अभियंता, उरुळी कांचन उपविभाग.

फोटो ओळ :- उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वीज बिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करताना महावितरणचे कर्मचारी.