शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिना एकटाच लढतोय गाव पाणीदार करण्यासाठी!

By admin | Updated: May 23, 2017 05:31 IST

दररोज सकाळी-संध्याकाळी २ तास श्रमदान केले... गेला दीड महिना सुमारे ४०० मीटरचा सलग समतल चर खोदला... एका पावसात सुमारे १३ हजार लिटर पाणीसाठा होईल

बाळासाहेब काळे । लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : दररोज सकाळी-संध्याकाळी २ तास श्रमदान केले... गेला दीड महिना सुमारे ४०० मीटरचा सलग समतल चर खोदला... एका पावसात सुमारे १३ हजार लिटर पाणीसाठा होईल एवढे काम केले... हे काम कोणत्या गावाने नव्हे, तर ७४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने केले. त्यांचे नाव आहे तुकाराम गणपत जगताप. पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द येथील हे शेतकरी आहेत. ४०० मीटरचा सलग समतल चर खोदून पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत आपल्या गावाचा सहभाग नोंदवला आहे. गावातील कोणीही त्यांना साथ दिली नसली, तरीही त्यांनी जिद्दीने हे काम केले.या परिसरात पावसाचे प्रमाण चांगले आहे. पावसाळ्यात जर दहा वेळा पाऊस पडला, तर सुमारे सव्वा लाख लिटर पाणी या सलग चरातून जमिनीत मुरू शकेल एवढे मोठे काम उभे केले आहे. यातून त्यांच्या उत्तुंग ध्येयासक्तीचे दर्शन घडले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई आणि पुरंदरच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, पाणी फाउंडेशनचे समन्वयक सुरेश सस्ते व त्यांचे सहकारी आदींनी त्यांच्या कामाला भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केलेच; शिवाय त्यांच्याबरोबरीने काही वेळ श्रमदान करून या ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाला सलाम केला आहे.पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके निवडलेले असून, पुरंदर तालुक्यातील ३३ गावे या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सुपे खुर्द येथील येथील शेतकरी तुकाराम गणपत जगताप यांच्यासह तिघांनी पाणी फाउंडेशनमार्फत सातारा जिल्ह्यातील अनपटवाडी (ता. कोरेगाव) येथे प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षणांनंतर गावात येऊन पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत गावाने सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, गावातील कोणीही त्यांना साथ दिली नाही. सोबत प्रशिक्षण घेणाऱ्या सहकाऱ्यांनीही साथ सोडली. शेवटी एकट्यानेच त्यांनी या कामाला सुरुवात केली. स्पर्धा सुरू झाल्यापासून आजअखेर स्पर्धेचा कालावधी संपेपर्यंत त्यांनी सकाळी-संध्याकाळी दररोज दोन तास श्रमदान करून जिद्दीचे दर्शन घडविले आहे.