शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणे हटवणार

By admin | Updated: May 7, 2017 02:29 IST

आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांतील २३ गावांमध्ये लोकशासन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे वनजमिनीवर

लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांतील २३ गावांमध्ये लोकशासन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे वनजमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी वन, महसूल, पोलीस विभाग यांचा एकत्रित कृती अराखडा तयार केला जाईल व पावसाळ्यापूर्वी ही सर्व अतिक्रमणे काढली जातील, असा निर्णय खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उपस्थित लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.लोकशासन आंदोलकांनी वनजमिनीवर केलेले अतिक्रमण व २ जुलै रोजी ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम या विषयांवर लांडेवाडी येथे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, सुनील गाडे, सहायक उपवनसंरक्षक डी. जे. घाडगे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वनक्षेत्रपाल योगेश महाजन, प्रजोद पालवे, कृषी अधिकारी संजय विश्वासराव, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर आदी उपस्थित होते.काही लोकांनी बेकायदेशीरपणे चळवळ उभारून वनजमिनींचा ताबा घेतला आहे. या लोकांनी ३ तालुक्यांतील २०० एकरांपेक्षा जास्त जमिनींचा ताबा घेऊन झाडे तोडली, जमिनीचे सपाटीकरण केले आहे. याकडे शासनाचे लक्ष नसून, ही बाब केंद्र व राज्य सरकारांनी गांभीर्याने घ्यावी, यासाठी खासदार आढळराव-पाटील यांनी लोकसभेतही आवाज उठवला आहे.ही अतिक्रमणे काढण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. वन, महसूल, पोलीस या विभागांनी कायदेशीररीत्या या लोकांना बाहेर काढण्यासाठी कृती अराखडा तयार करावा व पावसाळ्यापूर्वी या जागा मोकळया कराव्यात, अशी सूचना आढळराव-पाटील यांनी दिली. त्याप्रमाणे कृती अराखडा तयार करण्याचे ठरले असून, त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली जाणार आहे. जुन्नर : साडेतीन लाख झाडे लावणार२ जुलै रोजी राज्यात ४ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. यापैकी जुन्नर वन विभागात ३ लाख ६६ हजार झाडे लावली जाणार असून, आंबेगाव तालुक्यात १ लाख ३८ हजार झाडे लावली जाणार आहेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांबरोबर ग्रामस्थांनीदेखील यामध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावे, यासाठी गावोगावी हा कार्यक्रम पोहोचवला जाणार असल्याचे अर्जुन म्हसे-पाटील यांनी सांगितले. तसेच, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या ८ मे रोजी असलेल्या वाढदिवशी एक हजार झाडे लावली जाणार आहेत. यापैकी ६१ झाडे खासदारांच्या हस्तेलावण्यात येणार असल्याचे रवींद्र करंजखिले यांनी सांगितले.