शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अपात्र नगरसेवकांकडून मानधन वसुली

By admin | Updated: December 25, 2015 01:59 IST

पद तर गेलेच पण त्याचबरोबर त्या पदामुळे मिळालेले मानधनही द्यावे लागण्याची वेळ दोन माजी नगरसेवकांवर आली. नगरसेवक असताना त्यांनी स्वीकारलेले मानधन पालिका

पुणे : पद तर गेलेच पण त्याचबरोबर त्या पदामुळे मिळालेले मानधनही द्यावे लागण्याची वेळ दोन माजी नगरसेवकांवर आली. नगरसेवक असताना त्यांनी स्वीकारलेले मानधन पालिका प्रशासनाने त्यांच्याकडून वसूल केले. निवडणूक आयोगाच्या आदेशाने ही वसुलीची कारवाई करण्यात आली.कल्पना बहिरट व भरत चौधरी अशी मानधन वसूल करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. अशा अपात्र ठरलेल्या नगरसेवकांकडून मानधन वसूल करण्याचा प्रकार पालिकेकडून प्रथमच झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या अपात्रतेची दखल घेत त्यांना दिलेल्या मानधनाची वसुली करा, असा आदेश पालिका प्रशासनाला दिला . त्याप्रमाणे बहिरट यांच्याकडून ८२ हजार ३८८ तर चौधरी यांच्याकडून ३ लाख १८ हजार ९३ रुपयांची वसुली करण्यात आली. यात मानधनाबरोबरच सभांच्या उपस्थितीसाठी मिळणाऱ्या भत्त्याचाही समावेश आहे.बहिरट या सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मंगळवार पेठ येथील प्रभाग क्रमांक ४० अ मधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर लगेचच त्यांच्यावर जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप होऊन न्यायालयात तक्रार दाखल झाली होती. तिथे झालेल्या सुनावणीत त्यांचा दाखला बनावट असल्याचे सिद्ध झाले व एका वर्षातच त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले. भरत चौधरी कोंढवा खुर्द येथून प्रभाग क्रमांक ६३ अ मधून निवडून आले होते. त्यांचे जातीने कुणबी असल्याबाबतचे प्रमाणपत्र खोटे असल्याबाबत न्यायालयात तक्रार दाखल झाली. सुनावणीअंती हे प्रमाणपत्रही बनावटच असल्याचे सिद्ध होऊन त्यांचेही नगरसेवक पद रद्द झालेपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी न्यायालयाच्या निकालाप्रमाणे दोघांचेही नगरसेवक पद रद्द केले. निवडणूक आयोगाने या निकालाची दखल घेतली व या दोघांनी नगरसेवकपदाच्या कालावधीत पालिकेकडून स्वीकारलेले मानधन व भत्ते त्यांच्याकडून वसूल करा, असा आदेश पालिका प्रशासनाला दिला. यापूर्वीच्या पंचवार्षिकमध्येही काही नगरसेवकांचे पद जात प्रमाणपत्र खोटे आढळल्यामुळे रद्द झाले आहे. मात्र त्यांच्याबाबतीत असा मानधन वसुलीचा निर्णय झालेला नव्हता. या दोघांशिवाय प्रिया गदादे, बापू कांबळे व विजय देशमुख या तिघांचेही पद न्यायालयाच्या निर्णयाने रद्द झाले आहे. यातील प्रिया गदादे पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाल्या. कांबळे यांनी त्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. देशमुख यांच्याबाबत प्रशासनाला आयोगाने अद्याप काहीही कळवलेले नाही.