शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

मोदी- शहांना भारतापुढे झुकावेच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तीन दिवसात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या. अन्यथा दिल्लीच्या आंदोलनाला पूरक आंदोलन उभारले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तीन दिवसात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या. अन्यथा दिल्लीच्या आंदोलनाला पूरक आंदोलन उभारले जाईल असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी दिला. मोदी-शहा या जोडीला शेतकऱ्यांपुढे झुकावेच लागेल, असे ते म्हणाले.

मंगळवारी (दि. १५) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उपाध्यक्ष अजित अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष नाथा शिंगाडे यावेळी उपस्थित होते.

नवले म्हणाले की, केंद्र सरकारची हीच भूमिका राहिली तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. सरकारने लोकशाही विरोधी पद्धतीने मंजूर करवून घेतलेले तीन शेतकरी कायदे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना आधारभावाचे कायदेशीर संरक्षण देणारा कायदा केंद्रीय स्तरावर करावा, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावेत या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे.

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन गांभीर्याने घ्यावे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. यासाठी तीन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे नवले म्हणाले.