शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

मोदी- शहांना भारतापुढे झुकावेच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तीन दिवसात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या. अन्यथा दिल्लीच्या आंदोलनाला पूरक आंदोलन उभारले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तीन दिवसात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या. अन्यथा दिल्लीच्या आंदोलनाला पूरक आंदोलन उभारले जाईल असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी दिला. मोदी-शहा या जोडीला शेतकऱ्यांपुढे झुकावेच लागेल, असे ते म्हणाले.

मंगळवारी (दि. १५) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उपाध्यक्ष अजित अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष नाथा शिंगाडे यावेळी उपस्थित होते.

नवले म्हणाले की, केंद्र सरकारची हीच भूमिका राहिली तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. सरकारने लोकशाही विरोधी पद्धतीने मंजूर करवून घेतलेले तीन शेतकरी कायदे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना आधारभावाचे कायदेशीर संरक्षण देणारा कायदा केंद्रीय स्तरावर करावा, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावेत या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे.

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन गांभीर्याने घ्यावे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. यासाठी तीन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे नवले म्हणाले.