शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडे काम करण्यासाठी टीमच नाही

By admin | Updated: October 26, 2014 01:18 IST

सरकारमध्ये काम करण्यासाठी जो संच असावा लागतो तो मोदी सरकारकडे नाही. मात्र, त्यांना थोडा वेळ आणि संधीही दिली पाहिजे.

शरद पवार : आमची भूमिका ‘वेट अॅण्ड वॉच’
बारामती (जि़ पुणो) :  सरकारमध्ये काम करण्यासाठी जो संच असावा लागतो तो मोदी सरकारकडे नाही. मात्र, त्यांना थोडा वेळ आणि संधीही दिली पाहिजे. त्यामुळे आताचा काळ हा ‘वेट अॅण्ड वॉच’ असा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
 दिवाळीनिमित्त बारामतीत व्यापारीवर्गातर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.  पवार म्हणाले, ‘‘देशात उसाचे उत्पादन समाधानकारक आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ठीक होईल. इंधनात 5 ते 1क् टक्के इथेनॉल मिसळण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. 
आजर्पयत आपण 2 ते 3 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकलो नाही. मात्र, केंद्र सरकार कशा पद्धतीने पाऊल टाकते, यावर हे अवलंबून आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पाऊल 
टाकेल, असा समज आहे. लोकप्रियतेच्या संदर्भात लोकांच्यात समाधान होईल, असे निर्णय घेतल्यास वाईट परिणाम होतील. अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी खबरदारी घ्यावी लागते. मात्र, केंद्र सरकारबाबत इतक्यात निष्कर्ष काढणो योग्य नाही.’’
ते म्हणाले, ‘‘‘मॅन्युफ ॅक्चर’ क्षेत्रत चीन क्रमांक 1 वर आहे. त्यांच्याशी स्पर्धा करणो शक्य नाही. महासत्ता हे चीनचे स्वप्न आहे. चीन अर्थव्यवस्था आणि लष्कर असे दुहेरी मजबुतीकरण करीत आहे. चीनची लष्करी ताकद वाढल्यानंतर अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. सीमा भागात चीनने रेल्वे, रस्त्यांची सुविधा निर्माण केली. आपण प्रतिकूल नैसर्गिक रचनेमुळे या सुविधा निर्माण करू शकत नाही. ते एखाद्या जीपद्वारेदेखील त्या ठिकाणी पोहोचू शकतात. त्याचवेळी आपल्याला विमानाने जाण्याशिवाय पर्याय नाही. या सर्वबाबींचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. या प्रश्नाबाबत राजकारण केले जात नाहीत. मात्र, नव्या सरकारची नीती, कृती यावर ब:याच गोष्टी अवलंबून आहेत.’’
गेल्या काही महिन्यांत जगातील विशेषत: आखाती देशातील इंधनाचे दर कमी होत आहेत. ही जमेची बाजू आहे. मात्र, ही परिस्थिती किती दिवस टिकेल याबाबत साशंकता आहे. अमेरिकेची तेलाची मोठी साठेबाजी सुरू असल्याचे पवार म्हणाले. (प्रतिनिधी)
 
शरद पवार यांचा ‘यू टर्न’
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकेची झोड उठविली होती. मात्र, पवार यांनी आता आपली भूमिका बदलेली पाहायला मिळतेय. विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येताच, पवारांनी भाजपाला विनाशर्त पाठिंबा देण्याची तयारी केल्यानंतर मोदीसरकारबाबत आत्ताच निष्कर्ष काढणो योग्य नाही, असे मत व्यक्त केले आहे. मोदीसरकार बरेच काही करणार असे दिसते, आपण आता चमत्कारिक काळातून जातोय. या सरकारला काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे म्हणत त्यांनी मोदीसरकारची पाठराखण केली आहे.