शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडे काम करण्यासाठी टीमच नाही

By admin | Updated: October 26, 2014 01:18 IST

सरकारमध्ये काम करण्यासाठी जो संच असावा लागतो तो मोदी सरकारकडे नाही. मात्र, त्यांना थोडा वेळ आणि संधीही दिली पाहिजे.

शरद पवार : आमची भूमिका ‘वेट अॅण्ड वॉच’
बारामती (जि़ पुणो) :  सरकारमध्ये काम करण्यासाठी जो संच असावा लागतो तो मोदी सरकारकडे नाही. मात्र, त्यांना थोडा वेळ आणि संधीही दिली पाहिजे. त्यामुळे आताचा काळ हा ‘वेट अॅण्ड वॉच’ असा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
 दिवाळीनिमित्त बारामतीत व्यापारीवर्गातर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.  पवार म्हणाले, ‘‘देशात उसाचे उत्पादन समाधानकारक आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ठीक होईल. इंधनात 5 ते 1क् टक्के इथेनॉल मिसळण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. 
आजर्पयत आपण 2 ते 3 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकलो नाही. मात्र, केंद्र सरकार कशा पद्धतीने पाऊल टाकते, यावर हे अवलंबून आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पाऊल 
टाकेल, असा समज आहे. लोकप्रियतेच्या संदर्भात लोकांच्यात समाधान होईल, असे निर्णय घेतल्यास वाईट परिणाम होतील. अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी खबरदारी घ्यावी लागते. मात्र, केंद्र सरकारबाबत इतक्यात निष्कर्ष काढणो योग्य नाही.’’
ते म्हणाले, ‘‘‘मॅन्युफ ॅक्चर’ क्षेत्रत चीन क्रमांक 1 वर आहे. त्यांच्याशी स्पर्धा करणो शक्य नाही. महासत्ता हे चीनचे स्वप्न आहे. चीन अर्थव्यवस्था आणि लष्कर असे दुहेरी मजबुतीकरण करीत आहे. चीनची लष्करी ताकद वाढल्यानंतर अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. सीमा भागात चीनने रेल्वे, रस्त्यांची सुविधा निर्माण केली. आपण प्रतिकूल नैसर्गिक रचनेमुळे या सुविधा निर्माण करू शकत नाही. ते एखाद्या जीपद्वारेदेखील त्या ठिकाणी पोहोचू शकतात. त्याचवेळी आपल्याला विमानाने जाण्याशिवाय पर्याय नाही. या सर्वबाबींचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. या प्रश्नाबाबत राजकारण केले जात नाहीत. मात्र, नव्या सरकारची नीती, कृती यावर ब:याच गोष्टी अवलंबून आहेत.’’
गेल्या काही महिन्यांत जगातील विशेषत: आखाती देशातील इंधनाचे दर कमी होत आहेत. ही जमेची बाजू आहे. मात्र, ही परिस्थिती किती दिवस टिकेल याबाबत साशंकता आहे. अमेरिकेची तेलाची मोठी साठेबाजी सुरू असल्याचे पवार म्हणाले. (प्रतिनिधी)
 
शरद पवार यांचा ‘यू टर्न’
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकेची झोड उठविली होती. मात्र, पवार यांनी आता आपली भूमिका बदलेली पाहायला मिळतेय. विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येताच, पवारांनी भाजपाला विनाशर्त पाठिंबा देण्याची तयारी केल्यानंतर मोदीसरकारबाबत आत्ताच निष्कर्ष काढणो योग्य नाही, असे मत व्यक्त केले आहे. मोदीसरकार बरेच काही करणार असे दिसते, आपण आता चमत्कारिक काळातून जातोय. या सरकारला काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे म्हणत त्यांनी मोदीसरकारची पाठराखण केली आहे.