शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

भगवान महावीरांच्या संदेशावर आधुनिक विज्ञानाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:11 IST

दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संक्रमित रुग्णासमोर सरळ रेषेत उभे राहून न बोलता तुम्ही तिरपे ...

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना संक्रमित रुग्णासमोर सरळ रेषेत उभे राहून न बोलता तुम्ही तिरपे उभे राहून बोलत असल्यास

संक्रमणाचा धोका ८० टक्क्यांनी कमी होतो. २५०० वर्षांपूर्वी भगवान महावीरांनी सांगितलेल्या या नियमावर आधुनिक विज्ञानानेही नुकतीच मोहोर उमटवली आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. मात्र, अशा प्रकारच्या महामारीचे साथरोग हे दर शे-दीडशे वर्षांनी येत असतात. भगवान महावीरांनी आपल्या दिव्यदृष्टीने अशा महामारीच्या प्रसंगी कोणकोणती काळजी घ्यावयास हवी, याबाबतच्या स्पष्ट अशा सूचना देऊन ठेवल्या होत्या.

याबाबतचा उल्लेख आचार्य उमास्वातीजी यांनी २००० वर्षांपूर्वी संस्कृतमध्ये लिहिलेल्या ‘तत्त्वार्थ सूत्र’ या ग्रंथात मिळते.

सर्वा गतिर्जीवानां पुद् गलानां चाकाशप्रदेशानुश्रेणि भवति, विश्रेणिर्न भवतीति गतिनियम इति।।२।।

याचा अर्थ असा की, जीव आणि पुद् गलांची गती आकाश प्रदेशाच्या सरळ रेषेत असते. तिरपी नसते. हा गतीचा नियम आहे.

कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, आधुनिक विज्ञानाने विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रयोग सुरू केले. त्यात इतक्या सूक्ष्म कणांच्या हालचाली तपासण्यासाठी जगातील सर्वांत वेगवान आणि सर्वांत अचूक सुपर काॅम्प्युटर फगाकू (FAGAKU) चा उपयोग करण्यात आला. हा प्रयोग करण्यासाठी चार जणांना मास्क न घालता एका टेबलवर बसविण्यात आले. त्यांना फक्त एक मिनीट बोलण्यास सांगितले. फगाकू या सुपर संगणकाद्वारे असे समजले की, मनुष्याच्या तोंडातील लाळेचे सूक्ष्मकण कोणत्या दिशेने सर्वांत जास्त पसरतात. त्या सूक्ष्मजंतुंचे प्रतिबिंब सुपर संगणकावर दिसू लागले. यावरून असे समजले की, ते सूक्ष्मजंतू हे सरळ दिशेने जास्त वेगाने

पसरतात. म्हणजेच समोर बसलेल्या व्यक्तीच्या दिशेने ते कण पसरू लागले. त्यापैकी जवळ बसलेल्या व्यक्तीकडे जाणाऱ्या कणांची संख्या आजूबाजूला बसलेल्या व्यक्तींकडे जाणाऱ्या कणांपेक्षा पाच पटीने जास्त होती. ४५ अंश कोनामध्ये तिरक्या बसलेल्या व्यक्तीकडे जाणाऱ्या कणांची संख्या सर्वांत कमी होती. या प्रयोगाचे निष्कर्ष सायन्स नेचर या जगप्रसिद्ध संस्थेने (fb.com.science nature page/E223) नुकतेच जाहीर केले आहे. यावरून तत्त्वार्थ सूत्राची प्रचिती येते अशी माहिती श्रुतदीप रिसर्च

फाऊंडेशनचे प्रवर्तक आणि जैन धर्माचे गाढे अभ्यासक

वैराग्यरतिविजयजी महाराज यांनी दिली.

चाैकट

२००० वर्षांपूर्वीही महामारीविषयक सूचना

याशिवाय, आचार्य भद्रबाहूस्वामींनी, इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात रचलेल्या ‘ओघनिर्युक्ती’ या प्राकृत भाषेतील ग्रंथातही महामारी रोखण्यासाठी विविध सूचना दिल्या आहेत. त्यात महामारीने त्रस्त व्यक्तीला एकांतवासामध्ये (आयसोलेशन) ठेवणे, महामारीच्या काळात आवश्यक कारणांशिवाय घराबाहेर न जाणे, दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवणे अशा विविध सूचनांचा समावेश आहे. नेमक्या त्याच स्वरूपाच्या सूचना आता जागतिक आरोग्य संघटना, सरकारी आरोग्य विभाग यांनी दिल्या आहेत अशी माहिती संशोधनप्रिय जैनसंत श्री त्रैलोक्यमंडनविजयजी महाराज यांनी दिली.

—————————